ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊन कालावधीत पुणे विभागातून 25 मे पर्यंत 128 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशसाठी -15, उत्तरप्रदेश – 56 उत्तराखंड – 2, तमिळनाडू -2, राजस्थान- 5, बिहार- 33, हिमाचल प्रदेश 1, झारखंड – 6, छत्तीसगड – 4, जम्मू-कश्मीर-1, मणीपूर- 1, आसाम- 1 आणि ओरीसासाठी- 1 अशा एकूण 128 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या. यामधून 1 लाख 69 हजार 824 प्रवासी रवाना करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
उद्या (दि. 26) मे रोजी पुणे विभागातून 12 रेल्वे रवाना होणार आहेत. यामधून 16 हजार 800 व्यक्ती त्यांच्या राज्यात पोहचतील. या व्यतिरिक्त 6 हजार 769 बसेसव्दारे 1 लाख 3 हजार 287 व्यक्तींना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर व जिल्हयांमध्ये पोहचवण्यात आले आहे. तर वेगवेगळ्या भागातून पुणे विभागात 339 बसेसव्दारे 7 हजार 80 व्यक्ती आल्याचे म्हैसेकर म्हणाले.