कोल्हापूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करा, पेटून उठा, कार्यकर्त्यांनो फिल्डिंग टाइट ठेवा, विरोधकांना गोल करू देऊ नका. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. मिरजकर तिकटी येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, 2019 ला पाच वर्षांसाठी चंद्रकांत जाधव यांना निवडून आले होते. पण दुर्दैवाने त्यांचे कोविड नंतर ऑपरेशन झालं. त्यावेळी विश्रांती घेण्याची विनंती मी वारंवार केली. पण त्यांनी एकले नाही. शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचं काम चंद्रकांत जाधव यांनी केलं असे उद्गार दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
त्यांच्या निधनानंतर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जागा मिळाली. त्याबद्दल शिवसेनेचे आभार मानतो. महाविकास आघाडी अभेद्य आहे हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. निवडणूक बिनविरोध करायला भाजपचा सुरवातीला प्रतिसाद होता. मात्र पाच राज्याच्या निकालानंतर त्यांचा उन्माद वाढला. आणि निवडणूक लादली गेली. असा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला.
आज काँग्रेसने 50 वर्षात काय केलं? हा प्रश्न केला जातोय. त्यावेळी पालकमंत्री म्हणून काम केलं असतं तर चंद्रकांत दादांना पुण्याला पळून जावं लागलं नसते. जो माणूस कोल्हापूरला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेला. मग आज भाजपसाठी कोणत्या तोंडाने मत मागता? याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. या शहरात जे घडत ते महाराष्ट्र घडते.
ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी नाही तर भाजप विरुद्ध कोल्हापूरची स्वाभिमानी जनतेची आहे. पुढचे काही दिवस फिल्डिंग टाईट ठेवायची आहे. विरोधकांना गोल करू देऊ नका. असे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.