अध्याय चौदावा
भ्ागवंत उद्धवाला म्हणाले, भक्तांच्या प्राप्तीशिवाय मला इतर कोणतीही इच्छा नाही. प्रेमळ भक्तांसाठी मात्र मी सदोदित सकाम झालेला असतो. प्रेमळ भक्तांची परम भक्ती पाहिली की, तेथे मी उडीच घालतो आणि त्याला माझ्या बरोबरीला आणितो. परंतु काही वेळा मारुतीसारखा माझंच रूप असलेला भक्त, दास्यभक्ती करत असल्याने माझ्या बरोबरीने बसायचे नाकारतो व सदोदित माझ्या पुढय़ात उभा राहतो. अशा भक्ताला मी परमोच्च सुख अर्पण करतो. त्याच्याही पुढे जाऊन भक्त जर माझ्याजवळ येत नसेल, तर मी तत्काळ त्याचा चाकर होऊन राहतो. मोठेपणाचा मानमरातब सोडून मी आपल्या भक्तांची उष्टीसुद्धा काढतो. एव्हढंच काय, तो संकटात असेल तर मी आपला देहसुद्धा ओवाळून टाकतो. जे भक्त मला रात्रंदिवस आवडतात ते जीवाभावाने सर्वस्वी माझे लाडके होतात. संपूर्ण निस्वार्थ भक्तांची चित्तशुद्धी झालेली असल्याने, माझ्याबद्दल त्यांच्या मनात अनन्यता निर्माण होते. अत्यंत आवडीने माझे भजन करत असल्यामुळे माझे भक्त मला पूज्य असतात. अशा भक्तांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांना कशाचीही अपेक्षा नसते, ते शान्त व वैरभावरहित असतात, सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतात, त्या महात्म्याच्या चरणांच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र व्हावेत, म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो. आता अशा भक्तांच्या वैशिष्टय़ांबद्दल सविस्तर सांगतो. ते एकनि÷sने भजन करत असल्याने त्यांचे मन माझ्याच स्वरूपावर जडून राहते आणि सर्व वासना नष्ट होऊन वृत्तिशून्य स्थिती होते. म्हणजे त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र स्वभाव रहात नाही. माणसाच्या स्वभावाचा मुख्य दोष म्हणजे सतत कशाची ना कशाची अपेक्षा करत राहणे. त्याच्याउलट निरपेक्षता असते. निरपेक्षता म्हणजे कुणासाठी काही केल्यावर त्याच्याकडून बदल्यात कोणतीही अपेक्षा न करणे किंवा कुणाकडून कसल्याही परिस्थितीत कसलीच अपेक्षा न करणे. या निरपेक्षतेच्या कडेलोटाबद्दल असं सांगता येईल की, एखादी गोष्ट विनासायास हाताशी लागली आणि ती उचलावी असं नुसतं मनात जरी आलं तरी त्याची निरपेक्षता संपली असं समज.म्हणून अशा सहजी मिळणाऱया द्रव्याचीही उपेक्षा करून जो तेथून निघून जातो, तो सर्वस्वी मला वंदनीय होतो. म्हणून कोणतीही इच्छा न होणे म्हणजेच निरपेक्षता. आता इतर कोणत्याही इच्छा शिल्लकच नसल्याने माझे चिंतन, मनन करण्याव्यतिरिक्त अन्य काही करण्यासारखं शिल्लकच उरत नाही. ते तो कशा पद्धतीने करतो ते ऐक.
वेदशास्त्रार्थानं जे माझे स्वरूप अत्यंत प्रमाण मानले, त्या स्वरूपाच्या ठायी धारणा ठेवणे, त्यालाच मनन असे म्हणतात. ज्याप्रमाणे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न वाचल्याबरोबर केलेल्या अध्ययनाच्या जोरावर मनातल्या मनात त्या प्रश्नाचे उत्तर तयार होऊन कागदावर झरझर उतरू लागते त्याप्रमाणे स्वस्वरूपाचा विचार करत करत मनात स्वस्वरूपाचे विचार दृढ होऊन मनंच स्वसरूपाकार होऊन जाते. अशा पध्दतीने आपोआपच मनन होते आणि न करताच स्मरण घडते. शांती मिळवण्यासाठी काम, क्रोध आणि लोभ हे समूळ नष्ट होऊन, देह स्थिर होणं आवश्यक आहे. देह स्थिर झाला की, साधकाला देहाचेही भान रहात नाही काम, क्रोध व लोभ जिरून मिळणारी शांती भाग्यवंतालाच प्राप्त होते.
आता ह्यापुढे समतेचे स्वरूप तुला सांगतो. तसं बघायला गेलं तर प्राणिमात्र हे नानाप्रकारचे असून त्यांची नावेही निरनिराळी आहेत. हे सर्व जगच विचित्र आकारांनी विषम बनले आहे. तरी त्या सर्वांमध्ये परब्रह्म हे सारखेच भरलेले आहे हे माझ्या भक्तीच्या योगानंच माझ्या भक्तांच्या लक्षात येते. थोडक्मयात ज्या भक्ताला सर्वत्र परब्रह्म भरून राहिले आहे हे ठळकपणे लक्षात येते. त्याची ईश्वराच्या ठायी अनन्य भक्ती जडली आहे असं म्हणता येईल. माझ्या भक्तीने समानता हाती आली, म्हणजे प्राणिमात्रातील भेदबुद्धीच खुंटून जाते. तो सहजच भेदभावरहित होतो. आणि त्याला आपोआप निर्वैरपणा प्राप्त होतो.
क्रमशः