ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
फेब्रुवारी २०२१ पर्यंत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कमी अभ्यासक्रमाच्या आधारावर घेतल्या जातील. परीक्षेत ३३ टक्के अंतर्गत पर्याय दिला जाईल. एकूण अभ्यासक्रमांपैकी ३० टक्के अभ्यासक्रम रद्द करण्यात आला असून, काही राज्यांनी तो जाहीर केला आहे.
शिक्षकांशी थेट संवाद साधताना पोखरियाल म्हणाले,अंतर्गत शालेय परीक्षांसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सीबीएसईच्या अनेक शाळा ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा शक्य नाहीत. फेब्रुवारीनंतर परीक्षा कधी होतील, याचा विचार केला जाईल. कोरोना साथीमुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर पडत आहेत. कोरोना काळात शिक्षकांनी मुलांना योद्ध्यांसारखी शिकवण दिली आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणात कोणतीही कमतरता नव्हती.
शालेय स्तरावर एअर इंडियाचा अभ्यास सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश असेल. यंदा जेईई, नीट परीक्षा घेतली गेली. कोरोना काळात आयोजित केलेली ही सर्वात मोठी परीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.