परप्रांतातील बैलजोडय़ांचा सहभाग : शर्यत आजही
वार्ताहर / खानापूर
बलोगा (ता. खानापूर) ग्रामस्थांतर्फे येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे औचित्य साधून बुधवारपासून बैलगाडा शर्यतीला प्रारंभ केला. शर्यतीचे उद्घाटन परमपूज्य चन्नबसव देवरु अवरोळी मठ यांच्या सानिध्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबलसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
दीपप्रज्वलन स्वामीजेंच्या हस्ते झाल्यानंतर विविध दैवतांच्या प्रतिमांचे पूजन लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील, माजी जि. पं. सदस्य जोतिबा रेमाणी, भाजपा राज्य महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई, माजी सभापती सयाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, राजेंद्र रायका आदींच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत पिकेपीएसचे संचालक शंकर पाटील यांनी केले. शर्यतीत परप्रांतातील महाराष्ट्र, तामिळनाडू केरळ भागातून बैलजोडय़ा आल्या आहेत. शर्यत दोन दिवस चालणार आहे.
यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते प्रमोद कोचरी, लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील, माजी जि. पं. सदस्य जोतिबा रेमाणी, धनश्री सरदेसाई यांनीही शेतकऱयांना उपदेश करणारी भाषणे केली.
श्री चन्नबसव देवरु स्वामीजी म्हणाले, बलोगा गावाने आतापर्यंत खानापूर तालुक्मयाच्या इतिहासात सर्वात मोठी शर्यत आयोजित करून एक आदर्श निर्माण केला आहे.
कार्यक्रमाला भाजप नेते प्रकाश तिरवीर, चापगाव माजी अध्यक्ष अध्यक्ष रमेश धबाले, मार्केटींग सोसायटीचे संचालक कल्लाप्पा पाटील, भाजप सचिव गुंडू तोपिनकट्टी, शर्यत सम्राट परशराम कदम, जळगावचे मारुती चोपडे, तानाजी गोरल, पीडीओs हणमंत पाटीलसह अनेकजण उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन माजी उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले. सदर शर्यत गुरुवारी दिवसभर चालणार आहे.
या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 1 लाख रुपये असून त्यानंतरची अनुक्रमे 75000, 51000, 35000, 25 हजारासह अशी 20 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी या शर्यतीचा लाभ शेतकरी व बैलजोडी मालकांनी घ्यावा, अधिक माहितीसाठी 9844598999 किंवा 9844302428 या क्रमांकाचे संपर्क साधावा, असे आवाहन संजयोक वासुदेव नांदूरकर, अजित पाटील यांनी केले आहे.