बेळगाव / प्रतिनिधी
बस्तवाड (हलगा) येथील शिवारात लागवड करण्यात आलेले बटाटा बियाणे कुजत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बटाटा लागवड केलेले शेतकरी चिंतेत सापडले आहे. मान्सूनपूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकरी पेरणीबरोबर बटाटा लागवड केली आहे. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी लावगड करण्यात आलेले बटाटा बियाणे उगविण्याच्या आधीच कुजत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बटाटा लागवड केलेल्या शिवारात जावून कृषी अधिकारी व ग्राम सेवक यांनी बियाणांची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
यंदा सुरूवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने बटाटा लागवडीसाठी पोषक वातारण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र आता लागवड केलेले बियाणेच अचानक कुजत असल्याने शेतकरी अडचणी आले आहे. बस्तवाड (हलगा), हलगा, कोंडूसकोप, खमकारहट्टी, कोळीकोप्प आदी भागात पावसाळी बटाटय़ाची लागवड करण्यात आली आहे. सध्या पावसाला सुरूवात झाली असल्याने बटाटा लागवडीचे काम थांबले आहे. अद्यापही बटाटा लागवड शिल्लक असून उघडीप पडताच बटाटा लागवडीला जोर येणार आहे. मात्र बटाट बियाणे कुजत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लागवडीसाठी शेतकऱयांनी बटाटा बियाणे एपीएसीमधील अडत व्यापाऱयांकडून घरी आणून ठेवले आहे. मात्र घरातील बियाणे देखील कुजत असल्याचे शेतकऱयांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बटाटा लागवड कशी करावी,असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.
गतवषी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले होते. त्यातच कोरोनाच्या माहामारीमुळे जनता संकटात असतानाच आता लागवड केलेले बटाटा बियाणे कुजत असल्याने शेतकऱयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. एपीएमसीमधून 2600 ते 3000 रूपये प्रति क्विंटल दराने बटाटा बियाणांची खरेदी करण्यात आली असून मशागत, रासायनिक खत, मजूर यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च आला आहे. मात्र लागवड केलेले बटाटा बियाणेच आता खराब होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बटाटा बियाणे कुजलेल्या शिवारात आता कोणती पेरणी करावी असा प्रश्नही शेतकऱयांसमोर आहे.