म्हसवड / प्रतिनिधी :
महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक गावे जलमय झाली असून, गावांचा संपर्कही तुटला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांना पुराचे स्वरूप आले असतानाही कायम दुष्काळाचे चटके सोसणारी माणगंगा नदी अजूनही कोरडीच आहे.
वर्षातून 10 महिने कोरडी असणारी माणगंगा नदी वर्षातून 2 महिने वाहते. मागील 3 दिवसांपासून सर्वत्र पावसाची जोरदार बॅटींग सुरु असतानाही माणगंगा मात्र कोरडी ठणठणीत आहे.