बेंगळूर/प्रतिनिधी
नवरात्र उत्सवात रेल्वेगाड्यांना मागणी वाढण्याची शक्यता असूननैऋत्य रेल्वेकडून येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यात आणि परराज्याकरिता एकूण ४२ विशेष गाड्या सुरु करण्यात येणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या प्रस्तावानुसार या विशेष सेवेला ‘फेस्टिव्हल स्पेशल’ असे नाव देण्यात येईल. तसेच या रेल्वे गाड्या २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान चालविल्या जातील. या गाड्या किमान ५५ किमी ताशी वेगाने चालवाव्यात असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
नियोजित विशेष सेवेपैकी रोजच्या गाड्या केएसआर बेंगळूर-चेन्नई सेंट्रल, म्हैसूर-मयिलादुथुराई जंक्शन (तामिळनाडू), म्हैसूर-तूतीकोरिन(तमिळनाडू), केएसआर बेंगळूर-कन्याकुमारी (तमिळनाडू), यशवंतपूर-कन्नूर (केरळ), हुबळी-लोकमान्य टिळक (महाराष्ट्र), यशवंतपूर-हावडा (पश्चिम बंगाल), म्हैसूर-धारवाड, आणि हुबळी-सिकंदराबाद (तेलंगणा) असे मार्ग समाविष्ट करतात.