बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूर येथे झालेल्या भीषण अपघातात तामिळनाडूचे आमदार वाय प्रकाश यांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ऑडी कार खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेंगळुरात मंगळवारी रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये करुणासागर यांची पत्नी बिंदू, अक्षय गोयल, धनुषा आणि इशिता, सर्व केरळमधील, उस्तव हरियाणा आणि रोहित कर्नाटकमधील हुबल्ली येथील आहे. दरम्यान मृतांमध्ये तामिळनाडूचे आमदार वाय प्रकाश यांच्या मुलाचाही समावेश असून तामिळनाडू पोलिसांना याला दुजोरा दिला आहे. इतर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.