प्रतिनिधी /बेंगळूर
रोजगार नसल्याने नैराश्येतून आत्महत्या करणाऱयांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. राज्यात पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशातच रोजगार असलेल्यांनाही कोरोनामुळे रोजगार गमवावा लागला आहे. बेरोजगारीमुळे 2019 या वर्षात राज्यात 553 जणांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2016 ते 2019 दरम्यान, भारतात बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱयांची संख्या 24 टक्क्मयांनी वाढली आहे. 2019 मध्ये बेरोजगारीमुळे देशात 2,851 जणांनी आत्महत्या केली आहे. 2019 मध्ये बेरोजगारीमुळे देशात कर्नाटक राज्यात सर्वाधिक 553 जणांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र (452) आणि तामिळनाडू (251) राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा प्रवेश होण्यापूर्वीची ही आकडेवारी आहे.