खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या 4 व 5 ऑगस्टला झालेल्या धुवाधार पावसाने नदी-नाल्याना पूर आला होता. आता पुन्हा दुसऱयांदा नदीनाल्याना पूर आला आहे. शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला प्रारंभ झाला आहे शनिवार व रविवार दिवसभर मुसळधार पावसामुळे तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील नदी-नाल्यातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर असलेल्या हलात्री नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे.
खानापूर तालुक्याला रविवारी दिवसभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. शनिवारपासून सतत 12 तास पाऊस सुरुच होता. त्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना महापूर आला आहे. आणखी काही मार्गावरील नदी-नाल्यांच्या पुलावर पाणी आल्याने ते मार्ग वाहतुकीला बंद झाले आहेत. अनेक ठिकाणच्या शेतवाडीत पाणी तुडुंब भरल्याने पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
खानापूर तालुक्यात रविवारी दिवसभर सर्व पर्जन्यमान्य केंद्रात पावसाची शतकी नोंद झाली आहे. पैकी कणकुंबी, जामगाव, आमगाव, गवाळी पर्जन्यमान केंद्रात द्विशतकी नोंद झाली आहे. रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुक्यातील कणकुंबी येथे 236 मिली मिटर (9.5 इंच), गुंजी 128 मि. मी., लोंढा 152 मि. मी., खानापूर 128.2 मि. मी., नागरगाळी 58 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. बिडी येथे 80 मि. मी. तर कक्केरी पर्जन्यमान केंद्रात 93 मि. मी. पाऊस झाला आहे. जांबोटी येथे 166.8 मि. मी. इतका पाऊस झाला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मलप्रभा नदी तुडुंब वाहत आहे. सौंदत्ती नवलतीर्थ धरणातून सध्या 1 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने मलप्रभेवरील महापुराचा धोका तूर्त टळला आहे. त्यामुळे खानापूर नवीन पूल तसेच पाणी अडवण्याच्या बंधाऱयावर मुसळधार पाऊस होऊनही पूर आला नाही. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार 24 ऑगस्टपर्यंत मोठय़ा पावसाची शक्यता असल्याने आगामी आठवडाभर तालुक्यातील जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नदी-नाल्यातील पाणी पातळीत वाढ
गेल्या दोन-दिवसापासून सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. म्हादई, पांढरी व काळी नद्यानाही मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. कळसा-भांडुरा, हलात्री व कुंभार नाल्यांच्या पाण्याच्या पातळीतदेखील बरीच वाढ झाली आहे. पूर्व भागातील तट्टीनाला देखील इतके दिवस पाण्याच्या प्रतीक्षेत होता.
40 खेडय़ांचा संपर्क तुटला
दरवर्षी पावसाळय़ात जून-जुलै महिन्यात पुलावर पाणी येऊन तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. पण यावर्षी दीड महिन्याच्या कालावधीनंतर प्रथमच खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री नाल्यावर पाणी आले आहे. यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच जवळजवळ चाळीस खेडय़ांचा खानापूर शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामध्ये मणतुर्गा, तिवोली, नेरसा, अशोकनगर, गवाळी, पास्टोली, कोंगळा, तेरेगाळी, शिरोली, डोंगरगाव, जामगाव, अबनाळी, हेम्माडगा, देगाव, मेंडील, तळेवाडी, कृष्णापूर तसेच जोयडा तालुक्यातील आखेती, मेडा, वर्लेवाडी, रंगारुट, वटला. पालडा, विरंजोळ आदी गावांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. पुलावर पाणी आल्याने वाहतक बंद झाली असल्याने खानापूर-असोगा मार्गे काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील मलप्रभा नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे अनेक पुलावर तसेच बंधाऱयावर पाणी आल्याने ते सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामध्ये हब्बनहट्टी, तोराळी रस्त्यावरील देवाचीहट्टी बंधाऱयावर पाणी आल्याने तो मार्ग बंद झाला आहे. तेथून जवळच असलेले स्वयंभू हनुमान मंदिर पूर्णत: पाण्याखाली बुडाले आहे. खानापूर-जांबोटी रस्त्याला जोडणाऱया कांजळे रस्त्यावरील मलप्रभा नदी पुलावर पाणी नसले तरी पुलाच्या दोन्ही कडेला रस्त्यावर पाणी आल्याने तो ही मार्ग बंद झाला आहे. जळगा बंधारादेखील पाण्याखाली गेला आहे. यडोगा बंधाऱयावरही पाणी आल्याने तो मार्गही बंद झाला आहे. शिवाय कामशिनकोप, हिरेहट्टीहोळी बंधारादेखील पाण्याखाली गेला आहे.
पंधरा ते वीस खेडी अंधारात
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पश्चिम भागात पावसाचे तांडव नृत्य सुरू आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. पाऊस आणि वाऱयामुळे पश्चिम भागातील अनेक ठिकाणचे वीज खांब वाकले आहेत. आजुबाजूच्या झाडांच्या फांद्या पडून वीजवाहिन्या खाली येण्याचे प्रकारही दृष्टीपथास आले आहे. बऱयाच गावचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. गेल्या 4 तारखेला झालेल्या वादळी वाऱयासह पावसाने या भागातील वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. तो हेस्कॉमने पूर्वपदावर आणला होता. आता पुन्हा कणकुंबी भागातील पंधरा ते वीस खेडी गेल्या सात दिवसांपासून अंधारात गेली आहेत.
बिडी-पारिश्वाड मार्गावरील पुलावर पाणी, बससेवा बंद
तालुक्यातील बिडी-पारिश्व़ाड रस्त्यावरील मलप्रभा नदीवरच्या पुलावरदेखील बरेच पाणी आले होते. यामुळे सदर मार्गही वाहतुकीला बंद झाल्याने या मार्गावरुन जाणाऱया काही बससेवाही ठप्प झाल्या होत्या. या मार्गावर येणारी बेळगाव-चापगाव वस्तीची बसही बुधवारी आली नाही. यामुळे प्रवासी वर्गाचे हाल झाले.