जागतिक वन्यजीव दिन विशेष : वन्यक्षेत्रातही वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
जंगलातील वन्यजीवांचे रक्षण, संवर्धन आणि त्यांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो. नामशेष होण्याचा धोका असलेला वन्यसृष्टीच्या व्यापारावर बंधन आणणारा कायदा लागू झाला आणि या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
वन्यजीवांचे महत्त्व जाणून त्यांचे रक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण व्हावे, याकरिता वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी वनखाते ऑनलाईन झाले आहे. दरम्यान वनक्षेत्रात वाढ झाल्याने वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास वाढला आहे. त्यामुळे साहजीकच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. शिवाय दरवषी नवीन जन्म घेणाऱया वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे.
बेळगाव विभागातील 142009.96 हेक्टर भाग वनक्षेत्राने व्यापला आहे. साहजीकच नैसर्गिक अधिवास वाढल्याने वन्यप्राण्यांचे संवर्धन होत आहे. बेळगाव विभागातील लोंढा, नागरगाळी, भीमगड, खानापूर, कणकुंबी, गोल्याळी, जांबोटी, आदी जंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, गवे, चित्तळ, सांबर, कोल्हे, तरस, रानडुकरे आदींचा समावेश आहे. जंगलातील निर्धास्त चाल आणि काळजाचा थरकाप उडविणाऱया वाघांची संख्या वाढली आहे. स्टेट्स टायगर को-प्रीडेटर्स ऍण्ड इंडियाच्या अहवालानुसार खानापूर वनक्षेत्रात 8 वाघांचे अस्तिव असल्याचे स्पष्ट झाले होते.
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होणार
बेळगाव विभागात मच्छे, हलभावी, होसकोटी, शिरूर यासह खानापूर तालुक्मयातील ओतोळी, सावरगाळी, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी ठिकाणी नर्सरी आहेत. या नर्सरीतून दरवषी हजारो रोपांची निर्मिती होते. त्यामुळे वृक्ष लागवड वाढून झाडांची संख्या वाढली आहे. वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रातून जाणारे रस्ते दुरुस्त करून नवीन रस्ते तयार करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.
वनविभागाने वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. लोंढा, खानापूर, कणकुंबी, नागरगाळी व भीमगड अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या हालचालांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयांची व्यवस्था केली आहे. शिवाय जंगलात लागलेली आग तात्काळ विझविण्यासाठी उपग्रहाची उपलब्धता केली आहे. त्यामुळे वनक्षेत्रही वाढत आहे.
धामणे जंगल सफारीची भुरळ
धामणे येथील वनक्षेत्रात वनखात्याने जंगल सफारी सुरू केली आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रत्यक्षात जंगलात फिरून जैवविविधतेचा आनंद लुटता येत आहे. वनक्षेत्रात विविध जैवविविधतेबरोबर हत्ती, तरस, बिबटे, कोल्हे, मोर आदी वन्यप्राण्यांचे जवळून दर्शन होत आहे. येथील उंचावरून कोसळणारे धबधबे, बारामाही वाहणारे नाले, हिरवाईने नटलेली झाडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
वन्यप्राण्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य
वन्यप्राणी जंगलाचे दागिने असल्याने त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण ही फक्त सरकारचीच जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.
-विजयकुमार सालीमठ (मुख्य संरक्षणाधिकारी, बेळगाव)