गावातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-रखुमाई मंदिराचे लोकार्पण : चार दिवस विविध कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /किणये
टाळ-मृदंगाचा गजर व ज्ञानोबा माउली, तुकारामचा जयघोष आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी ज्ञानेश्वर माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा झाला. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तालुक्मयातील भाविकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठय़ा दिमाखात झाला. मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त चार दिवस गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 26 मार्चपासून मंदिर उद्घाटन सोहळय़ाला सुरुवात झाली. शनिवारी गावात विठ्ठल-रखुमाई मूर्ती व कलश मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महिला कलश व आरती घेऊन मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. विविध मान्यवरांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन व कलश पूजन करण्यात आले.
दि. 28 रोजी सकाळी मूर्ती प्रति÷ापना, पूर्णाहुती, आशीर्वचन व होमहवन आदी कार्यक्रम झाले. डॉ. विश्वनाथ पाटील, जट्टेवाडी व हरिगुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व धार्मिक विधी झाले. पुरोहित राजेश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱयांनी पौरोहित्य केले.
‘माता, माती व मातृभाषे’वर व्याख्यान
दुपारी माहेरवासिनींचा स्नेहमेळावा झाला. या मेळाव्यात डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे व्याख्यान झाले. ‘माता, माती व मातृभाषा’ या विषयावर त्यांनी व्याख्यान देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वामीजींचे पूजन, कासव पूजन, चौकट, कळस, गाभारा व तुळस पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मूर्ती प्रति÷ापना संत एकनाथ महाराजांचे बारावे वंशज हभप योगेश महाराज गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली.
मंगळवार दि. 29 रोजी गंगापूजन, महाभिषेक व महाआरती करण्यात आली. अंकली येथील शितोळे सरकार यांचे माउलींचे अश्व आणि या माउलीच्या अश्वांचा पंढरपूर येथील वाखरी येथे आषाढी एकादशीला रिंगण होतो. असाच रिंगण सोहळा बेळगुंदी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त शिवाजीनगर येथील मोकळय़ा जागेत झाला. हा रिंगण सोहळा खरोखरच डोळय़ांचे पारणे फेडणारा ठरला. अश्वांचे पूजन प्रेमानंद गुरव, शिवाजी बेटगेरीकर, यल्लाप्पा ढेकोळकर, प्रसाद बोकडे, ग्रा. पं. अध्यक्षा हेमा हदगल, लक्ष्मी ढौल, विधानसभा सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष सुरेश किणेकर व सदस्यांच्या हस्ते विविध पूजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकारांची कीर्तने
रिंगण सोहळय़ात अश्व फिरल्यानंतर वारकरी व भक्तमंडळी अश्वांच्या पायाखालील माती कपाळाला लावून घेत होते. जणू वाखरीतलच रिंगण सोहळय़ाचा अनुभव आल्याची माहिती वारकऱयांनी दिली.
भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. चार दिवस झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील थोर नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने झाली.
सोहळय़ाच्या माध्यमातून गावकऱयांची एकजूट
पश्चिम भागातील बेळगुंदी हे गाव या भागातील केंद्रबिंदू आहे. सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेले हे गाव मार्कंडेय नदी परिसराच्या व शेतशिवारांनी बहरून आलेल्या निसर्गरम्य परिसरात हे गाव वसले आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ानिमित्त गावातील सर्व राजकीय मंडळी, सर्व राजकारण, मतभेद बाजूला ठेवून उद्घाटन सोहळय़ाला एकत्र आली होती. गावकऱयांनी या सोहळय़ाच्या माध्यमातून आपली एकजूट दाखवून दिली असल्याचे निदर्शनास आले.