हिंडलगा-कलमेश्वरनगर परिसरातील रस्ता देखभालीकडे कानाडोळा केल्याने दयनीय अवस्था : प्रवाशांतून तीव्र संताप
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा फॉरेस्ट चेकनाका ते सहय़ाद्रीनगर पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे कानाडोळा करण्यात आल्याने संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कलमेश्वरनगर परिसरात रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी केलेली डागडुजी ही दिखावूपणाची झाली असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निधीची तरतूद केली होती. मात्र सध्या देखभालीच्या नावाखाली केवळ नाममात्र खड्डय़ांमध्ये डांबर घालून प्रशासनाची व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने आठ दिवसापूर्वी खड्डे बुजविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती. पण काही मोजक्मयाच खडय़ांमध्ये दगड आणि डांबर घालून खड्डे बुजविण्यात आल्याचा दिखावापणा केला आहे. मात्र कलमेश्वरनगर तसेच सहय़ाद्री नगर परिसरात असलेले मोठे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. खड्डय़ांमुळे अपघात होत असतानाही माती घालण्याची तसदी देखील घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्याचे रूंदीकरण करून चार वर्षे झाली पण रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे बुजविले नाहीत. तसेच कलमेश्वरनगर परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याला स्लोप नसल्याने पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांसह एपीएमसी मार्केट यार्डला जाणाऱया वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. वास्तविक पाहता रस्त्याची देखभाल वेळोवेळी करणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम खात्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. परिणामी हा रस्ता खड्डेमय बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच एपीएमसीला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. वाहनधारक या रस्त्याचा अवलंब करीत असल्याने वाहने या रस्त्याने परस्पर शहराबाहेर जात असतात. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. या अडचणींचा विचार करून रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. मात्र याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. सध्या या रस्त्याची स्थिती खूपच बिकट झाली असून, रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण बनल्याने दुसऱया बाजूच्या रस्त्याने वाहनधारक उलट दिशेने जात आहेत. परिणामी अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती तातडीने करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुलाची रुंदी वाढविणे आवश्यक
या रस्त्यावर सहय़ाद्री नगर ते हिंडलगा दरम्यान नाल्यावर दोन पूल असून, एका पुलाचे बांधकाम यापूर्वी करण्यात आले होते. पण या पुलावरील डांबर उखडून गेल्याने वाहनधारकांना ये-जा करणे अडचणीचे होत आहे. पुलादरम्यान रस्ता खूपच खराब झाला आहे. तर दुसऱया ठिकाणी असलेला पूल अरूंद असून, पुलाची रुंदी वाढविणे आवश्यक आहे. रुंदी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता जेसीबीने साफसफाई करण्यात आली होती. तसेच बांधकाम साहित्य देखील टाकण्यात आले आहे. मात्र हे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पुलाची रुंदी वाढविणे व पुलावरील डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.