प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून बाजारपेठ वगळता अन्य उपनगरांतील स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. भडकल गल्ली भंगीबोळ, इंदिरा कॉलनी परिसरातील गटारींची स्वच्छता करण्यात आली नसल्याने दुर्गंधी पसरून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
शहरातील कचऱयाची उचल आणि गटरींची स्वच्छता करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रति वर्षाला 40 कोटांचा निधी खर्च करते. पण खर्ची घालण्यात आलेल्या निधीचा आकडा पाहता स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. भडकल गल्ली व जिल्हा पंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या भंगीबोळातील व इंदिरा कॉलनी परिसरातील गटारींची स्वच्छता क्यवस्थित केली जात नाही. कचेरी रोड, भडकल गल्ली आदी परिसरातील गटारींची स्वच्छता केली जात नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून गटारींमधील कचरा काढण्यात आला नाही. यामुळे गटारी कचऱयाने माखल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये किडे झाल्याचे निदर्शनास आले. अशातच कचरा गटारीमध्ये पडत असल्याने समस्येत आणखीनच भर पडली आहे. कचऱयाची उचल वेळेत होत नसल्याने काही नागरिक गटारेत कचरा टाकत आहेत. चार दिवसाआड गटारीची स्वच्छता होत असल्याचे महापालिकेच्या लॉगबुकमध्ये दाखविण्यात येते. पण प्रत्यक्षात स्वच्छता होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही स्वच्छता कर्मचारी स्वच्छता काम करण्याऐवजी वेळ घालवून निघून जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे गटारी स्वच्छ करण्याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेला निवेदन दिले होते. पण आरोग्य विभागाकडून दखल घेतली जात नाही. गटारी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. गटारीत कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी गटारीमधील सांडपाणी पाझरून विहिरी व कूपनलिकांचे पाणी दूषित होत आहे. याबाबत वरि÷ अधिकाऱयांनी पाहणी करून कार्यवाई करावी, अशी मागणी होत आहे.