मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना स्थितीवरून सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. यावरूवन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप मुंबईत माध्यमांशी बोलताना केला आहे. यावेळी त्यांनी जिथे भाजपचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
केंद्राकडून महाराष्ट्रावर होणाऱ्य़ा आरोपवर माध्यमाशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही तीन राज्यं कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरली असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश आहे. कारण ही संपूर्ण लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली लढली जात आहे. महाराष्ट्र कोरोना संदर्भातील प्रत्येक सूचनेचं, नियमाचं पालन करत आहे. जी तीन राज्यं अपयशी ठरलं असं सचिव म्हणत आहेत तिथे बिगरभाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपाचं सरकार नाही तीच राज्यं अपयशी ठरली आणि जिथे सरकार आहे तिथे करोना पळून गेला…कारण तिथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत असं तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का?,” असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशीलपणे वागायला पाहिजे. असे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करु नयेत. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये अशा पद्धतीने कोरोनासंदर्भातील लढाई सुरु ठेवली आहे. आपलं राज्य मोठं आहे. पुणे, नागपूर, मुंबई ही मोठी शहरं आहेत. या शहरांवर संपूर्ण देशांचा भार आहे. याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे. लस, रेमडेसिवीर या गोष्टी भाजपच्या गुजरातमधील कार्यालयात हवी तेवढी मिळत आहेत. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती औषधं घेऊ शकतात पण महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगडला लस न देणं हा एकप्रकारे अमानुषपणा आहे. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केलं जात आहे. याचा निषेध करायला पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्वात प्रथम याचा विरोधी केला पाहिजे कारण हा महाराष्ट्राचा देखील एकप्रकारे अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा कसलाही अधिकार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Previous Articleमहिला आघाडीतर्फे शुभम शेळके यांचा प्रचार
Next Article येळ्ळूरमध्ये समितीच्या प्रचारफेरीला मोठा प्रतिसाद
Archana Banage
Archana Bange, a seasoned journalist with four years of experience, has made a notable impact in the field of journalism. She pursued her journalism studies at Shivaji University, Kolhapur, and began her career at Daily Sakal. Currently, Archana is a valued member of the Dainik Tarun Bharat group, where she focuses on reporting local news from the districts of Kolhapur, Sangli, Satara, Sindhudurg, and Ratnagiri in Western Maharashtra. Her expertise extends to various topics, including politics, breaking news, food, lifestyle, tourism, blogs, health, web stories, and captivating human interest stories.
Related Posts
Add A Comment