प्रतिनिधी/ पणजी
कांद्याचे गगनाला भिडत असतानाच गोवा सरकारने कांद्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो खरोखरच योग्य आहे. गोवा भाजपा महिला मोर्चातर्फे सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल नाईक यांनी सांगितले. गोवा सरकार अनेक चांगल्या योजना राबवित असून इस्रोच्या के. कस्तूरीरंगन यांनीही त्याची दखल घेतली असल्याचे शितल नाईक पुढे म्हणाल्या.
शनिवारी याथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या यावेळी त्यांच्या सोबत महिला मोर्चाच्या सुलेखा शेटय़े, रेखा कांडे, मनीशा पालयेकर, गौरी कामत, सिध्दी केरकर उपस्थित होत्या. 31 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दिवस या दिवसाच्या शुभेच्छा देऊन शितल नाईक पुढे म्हणाल्या की कोविड19 च्या संकटामुळे सगळ्याच बाजूने परिस्थिती बिकट असतानाही सरकार अनेक चांगल्या योजना राबवित आहेत. सरकारच्या कामाची विविध स्तरावर दखल घेतली जात आहे, गोव्यातच मात्र काही लोक सरकारच्या विरोधात बोलत असल्याचे शितल नाईक म्हणाल्या. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सहकार्य व्हावे या उद्देशाने कांद्याचे भाव भडकलेले असताना प्रत्येक रेशन कार्ड धारकाला 32 ते 33 रुपये प्रती किलो प्रमाणे दरमहिन्याला 3 किलो कांदे देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या योजने अतंर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या पायावर उभे रहाण्यास मोठे सहकार्य केले आहे. केवळ नोकरी मागे न लागता युवा वर्ग आता स्वताहाचा व्यवसाय सहजपणे सुरु करू शकतात. राज्यात मोठय़ा प्रमाणात महिला दिन दयाळ सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहे. या महिलाना दर वर्षी हयात असल्याचा व उत्पन्नाचा दाखल सरकारकडे सादर करावा लागतो. या वर्षी दोन्ही दाखले देण्यास शितीलथा देण्यात आली आहे. कोविड 19 चा काळ असून दोन्ही दाखले मिळविण्यासाठी महिला पंचायत तसेच पालिकेच्या कार्यालयात गर्दी करतील ही गर्दी टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नाईक यांनी सांगितले.