प्रतिनिधी / मडगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सत्तेवर आल्यास ‘अच्छे दिन’ आणणार असल्याचे सांगीतले होते. आज देशातील जनतेला त्यांच्या अच्छे दिनची गरज नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस सत्तेवर असताना जनतेचा इतका हाल कधीच झाला नव्हता. भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला खूपच त्रास सहन करायला लावलेला आहे. त्यामूळे मोदी सरकारने लवकरात लवकार इंधन दरवाढीचे दर कमी करण्यात यावे या करीता काँग्रेस पक्षातर्फे देशभरात इंधन दरवाढीवर आंदोलन सुरु केले असल्याचे काँग्रेसचे नेते युरी आलेमाव यांनी सांगीतले.
कुंकळ्ळी येथील पेट्रोल पंपवर कुंकळ्ळी काँग्रेस ब्लॉकतर्फे इंधन दरवाढी संदर्भात आयोजीत केलेल्या धरणे आंदोलनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱया या सरकारात आज अत्यावश्यक वस्तू देखील महाग होत चाललेल्या आहेत. राज्यात ऑक्सीजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे अनेक लोकांचा जीव गेला. काँग्रेसच्या काळात बांधण्यात आलेल्या ईएसआय हॉस्पिटलचा उपयोग आज जनतेला होत आहे. काँग्रेसने सदैव पुढच्या पिढीचा विचार करुन राज्यातील विकास केलेला आहे. त्यामूळे जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेवर आणण्याची गरज असल्याचे आलेमाव म्हणाले.