ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीमुळे भारत जगासाठी एक औषधी केंद्र बनला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले.
जनऔषधी दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आज 7500 व्या जनऔषधी केंद्राचे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, कोरोना लस निर्मितीसाठी जगभरातील शास्त्रज्ञ काम करत होते. मात्र, सुरुवातीलाच भारतात ही लस तयार झाल्याने भारताने 50 हून अधिक देशांना लस देऊ केली. त्यामुळे भारत जगासाठी एक औषधी केंद्र बनला आहे.
तसेच देशातील कोणतीही गरीब व्यक्ती औषधांपासून वंचित राहू नये म्हणून देशात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले. संपूर्ण देश मला परिवारासारखा आहे. त्यामुळे आरोग्य आणि औषधांच्या सर्वोत्तम सोईसुविधा आपल्याला देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असेही मोदींनी सांगितले.