ऑनलाईन टीम / नाशिक :
टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. अनेक शेतकऱयांनी ट्रक्टर भरून टोमॅटो रस्त्यात ओतून आंदोलन केले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सुद्धा अनेक शेतकऱयांनी काल टोमॅटो फेकून दिले आहेत. टोमॅटोची मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने सध्या येवल्यामध्ये टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर फेकले.
- औरंगाबादमध्येही शेतकरी आक्रमक
औरंगाबादमधील पैठणमध्ये काही दिवसांपूर्वी शेतकऱयांनी ट्रॉलीभर टोमॅटो रस्त्याकडेला फेकून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मुंबई हायवेवर शेतकऱयांनी तीव्र आंदोलन केले. अनेक ट्रक्टर टोमॅटो रस्त्यावर ओतून शेतकरी आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद जिह्यातील लासुर स्टेशन इथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मुंबई हायवे जॅम करून शेतकऱयांनी आंदोलन केले.