प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील मड्डीवाडा, पिळयेकरवाडा या भागातील ग्रामस्था?ना गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे .या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशा प्रकारची मागणी करीत आज स्थानिक पंचायत सभासद सदा गावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्था?नी वाळपईच्या पाणीपुरवठा कार्याला निवेदन सादर केले .
याबाबतची माहिती अशी की गेल्या तीन दिवसापासून सदर वाडय़ावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे .यामुळे जवळपास तीनशे घरांना याचा फटका बसल्याचे सदा गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षापासून सदर ठिकाणी असलेल्या विहीरीवरुन पाणी पुरवठा करण्यात येत होता. या विहिरीवर सार्वजनिक पाणी पुरवठा खात्याने एक पंप बसविला असून या पंपाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता.मात्र सदर पंप अचानकपणे बंद करण्यात आला. यामुळे या तीनही वाडय़ावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यांनी वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांना या संदर्भात निवेदन सादर केले व ही समस्या सोडविण्याची मागणी केली. जोपर्यंत ही सुविधा पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी सदा गावकर व ग्रामस्था?नी केली आहे .त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सदा गावकर यांनी सांगितले की अचानक विहीरीवर बसविलेला पंप बंद झाल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे .यामागे काही प्रमाणात राजकारण हैत असल्याची शक्मयता त्यांनी व्यक्त केलेली आहे .मात्र राजकारण सोडून द्या आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करा अशा प्रकारची मागणी सदा गावकर यांनी केलेली आहे. दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पंचायतीची एक खास ग्रामसभा रविवारी संपन्न झाली. या सभेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून गरमागरम चर्चा झाली. गेल्या दहा वर्षापासून ज्या विहिरीवर पंप बसविण्यात आलेला आहे सदर विहिरीपासून काही अंतरावर खड्डे खोदण्याचे काम सुरू होते .मात्र या खड्डय़ाच्या माध्यमातून विहिरीमध्ये पाण्याचा पुरवठा गढूळ होणार असल्याचे स्पष्ट करून काही ग्रामस्था?नी सदर खड्डय़ाचे काम बंद करावे अशा प्रकारची मागणी केली होती. मात्र सदर काम बंद करण्यात न आल्यामुळे काही ग्रामस्था?नी आक्रमक पवित्रा घेतला व शेवटी विहिरीच्या मालकांनी हा पंप बंद ठेवला अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.दरम्यान सदर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षापासून आपल्या मालकीच्या विहिरीच्या माध्यमातून अनेक भागाला पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झाली होती .गेली दहा वर्ष मोफत पाणी पुरवठा करण्यात येत होता .यामुळे सरकारकडून कोणत्याही प्रकारचे पैसे प्राप्त झालेले नाही. मात्र काही नागरिक राजकीय मुद्दा उपस्थित करून याठिकाणी गोंधळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत .आपल्या जागेमध्ये खड्डे खोदण्याचे काम सुरू होते. मात्र सदर खड्डय़ाचे काम बंद करण्याची काही जणांची मागणी होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्यामुळे राजकारण करून आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सदर मालकाने स्पष्ट केले. दरम्यान ग्रामस्था?नी पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित निकालात काढा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. सदर विहिरीवर बंद करण्यात आलेला पंप पुन्हा एकदा बसवून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करावी अन्यथा दाबोस प्रकल्पाच्या माध्यमातून थेट पाणी पुरवठा करण्यावर भर द्यावा अशी मागणी केली.