वार्ताहर/ भोसरे
भोसरे (ता.खटाव ) येथील अखिल भारतीय जिवा सेना संघटना शाखा भोसरे चौकीचा आंबा व सरसेनापती प्रतापराव गुजर अधिष्ठान भोसरे आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज यांच्या उपस्थित भोसरे येथे वार्षिक दिपोत्सव व शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती आलुतेदार बलुतेदार विकास परिषद सातारा जिल्हा आध्यक्ष श्री.संजय करपे यांची उपस्थिती होती.व प्राध्यापक बाळकृष्ण देसाई,सातारा.उदव कर्णे,अ.भा.जिवा.सेना सातारा जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ काळे,संर्पक प्रमुख अमर पवार,खटाव तालुका आध्यक्ष सुनिल साहेब,तालुका उपाध्यक्ष नागनाथ काळे,सुभाष जाधव,राहुल काळे,वंशज विष्णू गुजर,मंचिद्र गुजर,अभय कुलकर्णी,सागर जाधव,सरपंच नितीन जाधव,उपसरपंच हणमत गुजर यांची उपस्थिती होती.
यावेळी करपेसर म्हणाले की सरसेनापती प्रतापराव नाव कुडतोजी गुजर हे होते.छ.शिवाजी महाराज यांच्या सैनीका मध्ये सेवा करण्या साठी गेले होते.व त्यांचा प्रताप पाहून छ.शिवाजी महाराजानी सरसेनापती प्रतापराव गुजर असे उपादी दिली.व तेव्हा पासुन कुडतोजी चा सरसेनापती प्रतापराव गुजर झाले.त्यांचा दैदीप्यमान कर्तृत्व जाज्वल्य धर्मनिष्ठा राजाप्रति असणारा आदर शब्दासाठी आत्मसमर्पणास तयार होण्याचा बाणा आपल्याला दिशादर्शक आहे.यापैकी एकाद्या गुणाचे आपण थोडेसे अनुकरण केले तरी फार मोठे कार्य करु शकतो त्यांचा वैचारिक वारसा जतन करण्याचे काम कोणी एका व्यक्तीचे नसून संपूर्ण समाजाचे आहे.प्रतापरावाचे जन्मगाव भोसरे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव असून ही भोसरेवासियाच्या अभिमानाखगगगची गोष्ट आहे.असे मत संजय करपे यांनी व्यक्त केले.
प्रा.बाळकृष्ण देसाई म्हणाले की महाराष्र्टात खरे राज्य रयतेचे ते म्हणजे छ.शिवाजी महाराज होय त्यांचे तीन विश्वासु मावळे होते.त्यातील एक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर शूरवीर प्रतापराव गुजर यांच्या कर्तृत्वाचा वर्तमानकाळाला विसर पडता कामा नये स्वतंञ हिदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा सेनानी जेथे धारातीर्थी पडला ते ठिकाण आहे.नेसरीच्या खिंडीत असे ते म्हणाले.
उदव कर्णे म्हणाले की प्रतापराव गुजर यांचा इतिहास फार मोठा आहे.तुम्हाला अदिच्या वक्तत्यानी सांगीता आहेच पण खरे मंथन आपण एक बार घेऊ त्यावेळी आपणाला कमीत कमी चार ते पाच तासाचे व्याख्यान ठेवू कधी ही हाक मार आमी येण्यासाठी तयारच आहे.किंवा या क्रायक्रम आम्हाला प्रत्येक वर्षी येणे हा आमचा नित्याचा क्रम झाला.त्यामुळे लवकर एकादी मिटींग लावा म्हणजे आपण एकादा चांगला वक्ता बोलवू असे ते म्हणाले व ग्रामस्थानी आम्हाला जे प्रेंम दिलीत्याने ही भारावून गेलो .हिथुन पुढे प्रत्येक वर्षी आम्ही येवूच आसे ही त्यानी सांगीतले.
यावेळी प्रास्थाविक सरपंच नितीन जाधव यांनी मानले तर सूञसंचालन अभय कुलकर्णी यांनी मांनले तर आभार सोमनाथ काळे यांनी मानले.