पाच जणांना अटक, बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई, आर्थिक व्यवहार, अनैतिक संबंधातून खून
प्रतिनिधी / बेळगाव
पाच दिवसांपूर्वी लक्ष्मीनगर-मच्छे येथील ब्रम्हलिंग मंदिरापासून हाकेच्या अंतरावर दोन महिलांचा भीषण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. खुनाची मास्टरमाईंड काळय़ानट्टी येथील एक महिला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी, बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर आदी अधिकारी उपस्थित होते. आरटीओ सर्कलजवळ असलेल्या पोलीस जिमखाना इमारतीत ही पत्रकार परिषद झाली.
कल्पना मल्लेश बसरीमरद (वय 30, रा. काळय़ानट्टी, ता. जि. बेळगाव), महेश उर्फ मल्लाप्पा मोनाप्पा नाईक (वय 20, रा. सुरुते, ता. चंदगड, जि. कोल्हापूर), राहुल मारुती पाटील (वय 19, रा. बेळगुंदी, ता. बेळगाव), रोहीत नागाप्पा वड्डर (वय 21, रा. दुर्गामाता कॉलनी, गणेशपूर), शानूर नागाप्पा बन्नार (वय 18, रा. चव्हाट गल्ली, काळय़ानट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड, बी. ए. चौगुला, बी. एस. बिचगत्ती, दीपक माळवदे, वाय. वाय. तळेवाड, एम. एस. गाडवी, सी. एम. हुनशाळ, एन. एम. चिप्पलकट्टी, जी. वाय. पुजार, एस. एम. लोकुरे, सी. एस. शिंगारी आदींचा समावेश आहे.
दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता राजश्री रवी बन्नार (वय 21), रोहिणी गंगाप्पा हुलमनी (वय 23, दोघीही रा. काळय़ानट्टी, ता. बेळगाव) या दोन महिलांच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून चाकुने सपासप वार करुन त्यांचा भीषण खून करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड कल्पना ही महिला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
खून झालेल्या राजश्रीचे वडील रामचंद्र मल्लाप्पा कांबळे (रा. सुळगा-हिंडलगा) यांनी यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. खुनानंतर दुचाकीवरुन मारेकरी फरारी झाले होते. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले होते. घराजवळ वॉकिंगसाठी गेलेल्या दोन महिलांचा खून कोणी व कशासाठी केला? याचे गूढ वाढले होते. अखेर पाच दिवसांत संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलीस अधिकाऱयांना यश आले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खून झालेल्या रोहिणीचा पती गंगाप्पा उर्फ प्रशांत याचे कल्पना बसरीमरद हिच्याशी आर्थिक व्यवहार होते. अडीअडचणीला कल्पनाने गंगाप्पाला दोन ते तीन लाख रुपये दिले आहेत. रोहिणीबरोबर लग्न झाल्यानंतर गंगाप्पाने कल्पनाबरोबरचा संपर्क कमी केला. या रागातून कल्पनाने खुनाचा कट रचला.
कल्पनाने सुरुते (ता. चंदगड) येथील महेश उर्फ मल्लाप्पा नाईक व काळय़ानट्टी येथील शाहनूर बन्नार या दोघा जणांना विश्वासात घेवून आपल्या डोक्मयातील खुनाची कल्पना बोलून दाखविली. त्यासाठी बेळगुंदी येथील राहुल व गणेशपूर येथील रोहित या दोन तरुणांची मदत घेण्यात आली. कट रचून अत्यंत सफाईदारपणे खून करण्यात आला होता. पोलिसांना धागेदोरे सापडू नयेत, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक टिमच्या मदतीने मारेकऱयांच्या मुसक्मया आवळल्या आहेत.
आर्थिक व्यवहार…. प्रेमाचा त्रिकोण
खुनासाठी सुपारी देण्यात आली होती का? या प्रश्नाला पोलीस उपायुक्त म्हणाले, याला सुपारी खून म्हणता येणार नाही. गंगाप्पाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरुन कल्पनाने आपल्या नात्यातील तरुणांच्या मदतीने हे खून घडवून आणले आहेत. उपलब्ध माहितीनुसार प्रेमाचा त्रिकोणही खुनाचे मुख्य कारण आहे. त्या दिशेने पोलीस तपास सुरू आहे. कल्पनाच्या पतीचे निधन झाले आहे. एकाकी कल्पनाशी गंगाप्पाची घट्ट मैत्री होती. या मैत्रीतून कल्पनाने त्याला आर्थिक मदतही केली होती. मात्र रोहिणीबरोबर दुसरे लग्न केल्यानंतर गंगाप्पाने कल्पनाकडे दुर्लक्ष केले होते. तिच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नव्हते. या रागातून कल्पनाने खुनाचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
कट होता रोहिणीला मारण्याचा…. राजश्रीचा हकनाक बळी
गंगाप्पाची पत्नी रोहिणी ही पाच महिन्यांची गर्भवती होती. तिला संपविण्यासाठी राहुल पाटील व रोहीत वड्डर या दोघा जणांना मच्छे येथे पाठविण्यात आले. त्याचवेळी रोहिणी ही आपली मैत्रीण राजश्रीबरोबर फिरायला निघाली होती. मारेकऱयांनी रोहिणीच्या डोळय़ात मिरचीपूड टाकून तिच्यावर चाकुने सपासप वार केला. हा प्रकार पाहुन राजश्री तिला सोडविण्यासाठी पुढे आली. त्यावेळी तिच्यावरही चाकुने वार करण्यात आला. तिचा हकनाक बळी गेला.
निर्दोष भासविण्यासाठी….
महेश व राहुल हे दोघे जण त्यावेळी रोहिणीच्या खुनासाठी मच्छे परिसरात पोहोचले. त्यावेळी कल्पना, महेश व शानूर हे तिघे एका ठिकाणी थांबले. या प्रकरणाशी आपला संबंध नाही. खुनाचा प्रकार घडला त्यावेळी आपण दुसरीकडेच होतो हे तांत्रिकदृष्टय़ा सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्हीत आपली छबी कैद होईल याची या त्रिकुटाने काळजी घेतली होती. मात्र पोलिसांनी टॉवर लोकेशनच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. मारेकरी व कट रचणाऱयांमध्ये वारंवार झालेल्या संभाषणामुळे गुन्हेगार पोलिसांच्या जाळय़ात अडकले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.