दशकभरात दुकानांवर पाणी सोडावे लागण्याची व्यक्त केली भीती
प्रतिनिधी/ मडगाव
सरकारने पालिका कायद्यात दुरुस्तीसाठी काढलेला वटहुकूम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सदर आश्वासन येण्यापूर्वी, हा वटहुकूम व्यापाऱयांच्या हिताचा नसून त्यामुळे राज्यातील पालिका बाजारपेठांमध्ये दुकाने असलेल्या दुकानदारांना दशकभरात दुकानांवर पाणी सोडावे लागेल अशी भीती मडगावच्या न्यू मार्केटमधील व्यापाऱयांनी व्यक्त केली.
सोमवारी सकाळी न्यू मार्केटमधील व्यापाऱयांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यास बहुतेक व्यापारी उपस्थित होते. न्यू मार्केट टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी यावेळी सदर वटहुकूम आणून राज्य सरकारने पालिका कायद्यात दुरुस्ती केल्याने ते मार्केटमध्ये दुकाने असलेल्या व्यापाऱयांना कसे मारक ठरेल त्याची माहिती दिली होती. सदर दुकाने आमचे आजोबा, वडील चालवत आले असून आता आम्ही ती चालवत आहोत. आणखी 10 वर्षांनी पालिकांना सदर दुकानांचा लिलाव करण्याची मुभा दिल्याने आमचा अधिकार हिरावून घेतला जाईल व ही दुकाने अन्य कोणाच्या नावावर होईल. सदर दुकाने कुटुंबातील अन्य कोणाच्या नावे करणेही शक्मय होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
रविवारी म्हापसा येथे बोलाविण्यात आलेल्या बैठकीला राज्यातील सर्व बाजार संघटनांच्या पदाधिकाऱयांनी उपस्थिती लावली होती. आम्हीही त्यास उपस्थित राहून आलो, असे शिरोडकर यांनी सांगितले. या वटहुकुमाच्या विरोधात 7 रोजी राज्यभरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता त्यास पाठिंबा देऊन सदर दिवशी मडगावची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. मात्र त्याचबरोबर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या भेटीसाठी वेळ मागून घेण्यात आली असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱया आश्वासनानुसार बंदच्या निर्णयात फेरबदल होऊ शकतो. त्यासंदर्भात व्यापाऱयांना आवश्यक माहिती दिली जाईल, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले होते.