महाड / प्रतिनिधी
सोमवारी संध्याकाळी महाड शहरांतील काजळपुरा परिसरांतील ताहिर गार्डन ही इमारत पत्याच्या बंगल्या सारखी कोसळली आणि संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये या दुर्घटनेचे पडसाद उमटले.ढिगाऱयांतून आता पर्यत दोन मृत देह बाहेर काढण्यांत आले आहेंत तर पंधराजण जखमी झाले आहेंत.या दुर्घटने प्रकरणी पालिकेचे अधिकारी,बिल्डर यांच्यासह पाच जणांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यांत आले आहेंत.या सर्वाना अटक करण्यासाठी विषेश पोलिस पथक रवाना करण्यांत आले असल्याची माहिती महाड शहर पोलिसांनी दिली.
महाड इमारत दुर्घटने मध्ये दोषी असलेल्या बिल्डरवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ अनिल पारसकर यांनी दिल्या नंतर पालिकेचे ज्युनिअर इंजिनिअर सुहास कांबळे यांनी महाड शहर पोलिस ठाण्या मध्ये पाच जणांच्या विरोधांत तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी त्यावेळचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी या इमारतीला भोगवटा प्रमाण पत्र देताना हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप ठेवण्यांत आला आहे त्याच बरोबर विकासक फारुक काझी, रा तळोजा, बाहूबली टि धमाने आरसीस सल्लागार,श्रावणी कन्सटंट नवी मुंबई, गौरव शहा व्हर्टिकल आर्किटेक ऍड कन्सटंट नवी मुंबई,यांनी निकृष्ट काम केले, पालिकेचे त्यावेळचे ज्युनिअर इंजिनिअर शशिकांत दिघे यांनी इमारतीला रहिवासी दाखला देताना इमारतीची योग्य तपासणी केली नसल्याचा आरोप ठेवण्यांत आला असुन यांच्यावर भादवी 304,304 अ,337 व 338,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला, पोलिसांचे विषेश पथक वरील सर्व आरोपींना अटक करण्यासाठी रवाना करण्यांत आले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिप्त पोलिस निरिक्षक शैलेश सणस यांनी दिली.
सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला ताहिर गार्डन ही दहा वर्षा पुर्वी बांधण्यांत आलेली बिल्डींग अचानक कोसळल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले,धुळीचे लोट पसरले,इमारत कोसळत असल्याचे लक्षांत येताच त्या परिसरांतील कांही जागरुक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरवात केली. एनडीआरएफची तीन पथके ढिगारा काढण्याचे काम करीत असुन जखमी रहिवाश्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या इमारती मध्ये एकुण 41 सदनीका,1 कार्यालय,1 जीम आणि 1 मोकळा हॉल होता. ए विंग मध्ये 21 सदनिका होत्या या मध्ये रहात असलेल्या व्यक्तींची संख्या 54 असल्याचे प्रशासना कडून सांगण्यांत आले.त्यांतील 41 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यांत यश आले आहे.अद्याप इमारतीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या व्यक्तीची संख्या 13 आहे. बी विंग मध्ये 20 सदनिका असुन त्यात राहात असलेल्या व्यक्तींची संख्या 43 आहे, दुर्घटना घडल्या नंतर इमारती मधुन आता पर्यत 37 जणांना जरी सुखरुप बाहेर काढण्यांत आले असले तरी ढिगाऱया खाली सहा जण असल्याची शक्यता वर्तविण्यांत येत आहे.या इमारती मधील दोन विंग मध्ये एकुण 97 व्यक्ती राहात होत्या त्या पैकी 78 जणांना सुखरुप बाहेर काढण्यांत आले तर 19 जण ढिगाऱया मध्ये अडकले असल्याची माहिती महसुल विभागाने दिली. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ज्या जखमींना बाहेर काढण्यांत आले आहे त्याच्यावर महाड ग्रामिण रुग्णांलयांमध्ये उपचार करण्यांत येत असुन नमिरा शौकत मसुरकर वय 19,संतोष सहानी वय 24,दिपक कुमार वय 21,स्वप्निल प्रमोद शिर्के वय 23,नवीद हमिद दुष्टे,वय 32 यांचा जखमीमध्ये समावेश आहे, या दुर्घटने मध्ये देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती पाहाण्यास मिळाली तब्बल 18 तासाने एनडीआरएफच्या जवानांनी मोहमद नदीम बांगी या चार वर्षाच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यांत यश मिळाले आहे. सयद अमिद समिर वय 45,नविद झमाणे रा.अप्पर तुडील वय 30,नौसिन नदीम बांगी वय 30, अदि हसिन शेखनाग वय 16,रोशनबी देशमुख वय 56,फातीमा अन्सारी वय 40इसतम हसिम शेखनाग वय 42,अल्ल तिमस बल्लारी वय 27,शैकत आदम अलसुलकर वय 27, असे एकुण दहा मृत देह संध्याकाळी पाच वाजे पर्यत बाहेर काढण्यांत एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. ढिगाऱया खाली 16 जण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढिगारा काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असुन संध्याकाळ पर्यत चित्र स्पष्ट होईल असे प्रशासना कडून सांगण्यांत आले. इमारतीचा ढिगारा काढण्या साठी साळूंके ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स, कोल्हापुर रेस्क्यु टिम या स्वयंसेवी संस्थोचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले आहे. या शिवाय स्थानिक तरुणांचा सहभाग देखिल महत्वाचा ठरला आहे. या दुर्घटनेचा साक्षिदार काजळपुरा परिसरांतील युवक स्वप्निल प्रमोद शिर्के हा अनेकांचा देवदुत ठरला त्याला ज्यावेळी इमारतीचा कांही भाग कोसळत असल्याचे दिसुन आले,स्वप्निलने त्वरीत हालचाल केली, त्याने इमारती मधील पंधरा पेक्षा अधिक जणांना बाहेर काढण्यांत यश मिळविले. स्वप्निलने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने पंधरा जणांचे प्राण वाचविता आले. या मध्ये तो स्वत: जखमी झाला असुन त्याच्यावर ग्रामिण रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेंत.त्याने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इमारत दुर्घटनेची घटना घडल्या नंतर हजारो हात मदतीसाठी पुढे आले आहेंत,महामार्गाचे काम करीत असलेल्या एलएन्ड टी कंपनीने आपल्या अवजड यंत्र सामुग्रीसह मदत करण्यास सुरवात केली असुन जे नागरिक जखमी झाले आहेंत त्यांना रक्ताची निकड लक्षांत घेता महाड येथील जनकल्याण रक्त पेढीने केलेल्या आवाहनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.अवघ्या चार तासांमध्ये 64 तरुणांनी रक्तदान केते आहे तर तालुक्यांतील असंख्य तरुण रक्त दान करण्यासाठी पुढे येत आहेंत.
आज पहाटे दुर्घटनाग्रस्त ठिकाणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण परिसराची पहाणी केली,परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला वेगाने मदत कार्य करण्याच्या सुचना दिल्या,त्याच प्रमाणे या दुर्घटनेला जे जे जबाबदार आहेंत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखिल ना.शिंदे यांनी दिले.यावेळी रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे,महाडचे आमदार भरत गोगावले,महाडच्या नगराध्यक्षा श्रीमती स्नेहल जगताप,माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी,पोलिस अधिक्षक डॉ अनिल पारसकर,अप्पर जिल्हाधिकारी डॉ भरत शितोळे,अप्पर पोलिस अधिक्षक संचिन गुंजाळ यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.