ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या 10 हजारांवर पोहचली आहे. राज्यात शनिवारी 223 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत 10 हजार 116 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना मृत्यू दर सध्या 4.1% आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभरात 8169 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 46 हजार 600 वर पोहचली आहे. 1 लाख 36 हजार 985 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 99 हजार 202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 55.55 % आहे.
कोरोनाने मुंबईत सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. मुंबई आणि ठाण्यात 7179, पुणे विभागात 1469 तर नाशिक विभागात 730 जणांचा मृत्यू झाला आहे.