प्रतिनिधी/ बेंगळूर
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांना लागू करण्यात आलेली आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याच्या सचिवांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यात येणाऱयांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे आता बंधनकारक असणार नाही. मात्र, त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे.
राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र आणि केरळ राज्यातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केला होता. आता महाराष्ट्र आणि कर्नाटकात रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने आरटीपीसीआरची सक्ती मागे घेतली आहे.