मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा जनतेला इशारा, अशीच रूग्णवाढ राहील्यास पंधरा ते वीस दिवसात रूग्णालये तुडंब,
विरोधकांनी राजकारण करण्यापेक्षा जबाबदारी घ्यावी
प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर नाईलाजाने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते राज्यातील जनेतशी सोशल मिडियाच्या माध्यमातुन संवाद साधताना बोलत होते.
गेल्या मार्चपेक्षा यंदा कोरोना राक्षस मोठा, कोरोना नवनवी रुपात येत आहे. विषाणू नवी रुपं धारण करत आहे, ही भीती मी मागेही व्यक्त केली होती. राज्यात 70 टक्के चाचण्या करत असुन भविष्यात या चाचण्या वाढवणार असल्याचे त्यांनी बोलताना एकीकडे लसीकरण वाढवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी विगलीकरणात सध्या 2 लाख 20 हजार बेड्स आहेत. त्यापैकी 1 लाख 37 हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे 65 टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे 20519 आहेत. ते जवळपास 48 टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स 25 टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुर्या पडतील आणि येत्या 15 ते 20 दिवसात रूग्णालय कमी पडतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
रूग्णवाढ रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का ? मात्र आपण सगळ्यांनी मिळुन जर गेल्या वर्षी सारखा कोरोनाचा सामना केला तर लॉकडाऊनची गरज लागणार नाही मात्र पहिला जीव वाचवायचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
येत्या काही दिवसात मी तज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्यांच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावले उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचें जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध उद्या परवा जाहिर करु
अशीच परिस्थिती राहीली तर कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु असे मुख्यमंत्री म्हणाले.येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा असे ही मउख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं
लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावे, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावे आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढायची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण मी सत्यच सांगणार
राज्यातील स्थिती भीतीदायक असली तरी आपण सत्य समोर आणतोय.. इतर राज्यात निवडणुका असो किंवा काय तिकडे कोरोना नाही असं विचारलं जातं, पण मला त्या राज्यांचे पडलेलं नाही, मला महाराष्ट्र प्यारा आहे. मी सत्यच सांगणार मग मला व्हिलन ठरवलं तरी चालेल
पॉईंटर्स
75 हजारावरुन रोज 1लाख 82 हजार चाचण्या केल्या जात असुन रोज अडीच लाखाचे लक्ष्य
सगळी व्यवस्था वाढवल्या तरी डॉक्टर नर्स कुठुन आणायचे
काल एका दिवसात 3 लाखाचे लसीकरण दिवसा 6 ते 7 लाख लसीकरणाचे लक्ष्य
मास्क न वापरण्यात शुरता नाही