महाराष्ट्रत जाण्यासाठी गोवेकरांना लागणार कडक नियम. गोवा सरकारमाञ वाढत्या कोरोन काळात निर्बंध घालण्यास उदासीन
प्रतिनिधी / पेडणे
महाराष्ट्र सरकारचे वाढत्या कोरोन काळात कडक नियम, महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी गोवेकरांना लागणार कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गोवा सरकार मात्र वाढत्या कोरोना काळात कडक निर्बंध घालण्यास उदासीन असल्याचे दिसून येत असून महाराष्ट्र राज्यातून पेडणे तालुक्मयात प्रवेश करणाऱया नागरिकांवर गोवा सरकार मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.
पेडणे तालुक्मयात प्रवेश करण्यासाठी लागणाऱया सीमाभागातील गेटी अजूनही उघडय़ाच असल्याने पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा संवेदनशील जाहीर करून कडक नियम केले आहेत. त्यांचा जबरदस्त फटका गोवेकराना बसत आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी किती वेळा जाणार व किती वेळ थांबणार त्याचा ई पास ऑनलाईन काढावा लागेल. तो पास नसेल तर आपल्याला प्रवेश नाही. मात्र महाराष्ट्र येथुन येणाऱयाना कोणत्याच प्रकारचा पास किंवा तपासणी पत्रदेवी ,नईबाग आणि किरणपाणी या तिन्ही नाक्मयावर गोवा हद्दीत नाही. माञ महाराष्ट्र राज्यात कडक तपासणी महाराष्ट्र सीमाभागात चालू आहे . तिन्ही नाक्मयावर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे .
गोव्यातून जे कोणी महाराष्ट्रात प्रवेश करणार त्याच्याजवळ ईपास असणे आवश्यक आहे . या नाक्मयावर तेथील पोलिसांकडून कडक तपासणी केली जाते .
सीमाभागातील नागरिक बांदा ,आरोंदा या बाजार पेठेवर अवलंबून आहेत . दैनंदिन आणि आठवडय़ाचा महिन्याचा पुरुमेतसाठा करण्यासाठी या जवळच्या बाजारात गर्दी करत असत, मात्र आज पहाटे पासून नाक्मयावर महाराष्ट्रात जाणाऱयांकडे ई पास नसल्याने रोखले गेले .त्याचा बराच परिणाम गोवेकारावर जास्त करून सीमा भागातील नागरिकांवर, व्यापाऱयांवर झाला आहे .
पेडणे तालुक्मयात समुद्र किनारी तसेच बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता लोक गर्दी करत आहेत.