प्रतिनिधी/सांगली
राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेर्धात सांगलीत भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करावेत, अन्यथा मंत्र्यांच्या गाडया आडवू असा इशारा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे यांनी दिला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे. महिलांच्यावर अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाची सत्र सुरूच आहेत. सांगली जिल्ह्यात देखील त्याचे प्रमाण लक्षवेधी ठरत आहे. सांगली जिल्ह्याची परिस्थिती तर भयानक आहे. गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात 62 बलात्कारांच्या केसेस दाखल आहेत. तर 193 केसेस ह्या विनयभंगाच्या दाखल आहेत. तरीही राज्य सरकार आणि गृहखातं याकडे गांभीर्याने पाहत नाही. महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित महिलांच्या सुरक्षेबाबत त्वरित कडक कायदे बनवावेत अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडवू असा इशारा ॲड. स्वाती शिंदे यांनी दिला.
यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, नगरसेविका भारती दिगडे, कल्पना कोळेकर, अप्सरा वायदंडे, गीतांजली ढोपे-पाटील, लक्ष्मी सरगर, ज्योती कांबळे, छाया हाके, स्मिता पवार, सुजाता रक्तवान, उषा गायकवाड, गंगाताई तिडके, शोभा बिक्कड, सुनिता इनामदार, वैशाली शेळके, शकुंतला काशीद, ललिता कांबळे, सुनिता भोसले, शैलजा कोळी, लीना सावर्डेकर, रुपाली देसाई, वैशाली पाटील, निकिता चव्हाण, कल्पना जाधव, सुरेखा भोसले, कलावती भोसले, गीता कुंभार, मंजुळा कुंभार, नीता पळसे, सुरेखा बोत्रे, सुप्रिया पटवर्धन आदी उपस्थित होते.