ऑनलाईन टीम/तरुण भारत
लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी गुरुवारी मांडला आणि हे विधेयक संमत करण्यासाठी संसदेत केव्हा मांडले जाईल अशी विचारणा केली. लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखून ठेवण्याचे विधेयक २५ वर्षांपूर्वी संसदेत मांडण्यात आले, मात्र आतापर्यंत त्याबाबत काहीही झाले नाही, असे कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा मांडताना सांगितले.
दरम्यान, कनिमोळी यांनी हे विधेयक राज्यसभेत संमत करण्यात आले. आम्ही हे विधेयक पारित करण्यासाठी आणू, असे या सरकारने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सांगितले होते; पण त्यांनी त्याबाबत काहीही केलेले नाही’, असे कनिमोळी म्हणाल्या.