प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील मेर्वी-जांभूळआड येथे शेतकऱयावर हल्ला करणाऱया बिबटय़ाला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत़ सोमवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील बचाव पथक रविवारी रत्नागिरीत दाखल झाले. अत्याधुनिक यंत्रणांसह सज्ज असलेल्या या पथकाकडून मेर्वी परिसरात अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.
मेर्वी येथे नुकताच चंदुरकर यांच्यावर 6.30 च्या सुमारास बिबटय़ाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत मेर्वी पोलीस पाटील यांनी वन विभागास माहिती दिली होती. बिबटय़ाने आपल्या बछडय़ाच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मक दृष्टीने हा हल्ला केल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. त्यानंतर वनविभागाने तत्काळ रुग्णवाहिकेची सोय करून जखमी चंदुरकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वनअधिकाऱयांनी जखमी चंदुरकर यांची हॉस्पीटमध्ये जाऊन विचारपूस केली. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून बिबटय़ाने हल्ला केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली.
हल्ला करणारा बिबटय़ा दोन बछडय़ांसोबत होता. ते ठिकाण बेहेरे यांच्या आंबा बागेतील आहे. या बागेतून आपण गुरे चरायला सोडून घरी परतत होतो. तेव्हा हा हल्ला झाल्याचे जखमी चंदुरकर यांनी सांगितले. बिबटय़ास जेरबंद करण्यासाठी या भागात वन विभागामार्फत पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच या परिसरामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. बिबटय़ाचा मागोवा घेऊन त्याला पिंजऱयामध्ये जेरबंद करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली) येथील बचाव पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी वन विभागाने तत्परता दाखवली आहे.
नागरिकांना सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर तसेच शेतामध्ये जाऊ नये. रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक असेल तर फिरावे. शक्यतो फिरताना हातात काठी तसेच बॅटरी घेऊन बाहेर पडावे. बिबटय़ा दिसल्यास त्याचा पाठलाग करणे तसेच मागोवा काढत फिरणे या बाबी प्रकर्षाने टाळाव्यात. परिसरामध्ये मनुष्य, पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास तत्काळ वनविभागास कळवण्यात यावे, असे आवाहन रत्नागिरी परीक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी केले आहे.