प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांना गृहीत धरू नये. केजरीवाल यांनी गोमंतकीयांना दिलेले मोफत विजेचे आश्वासन म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी केली.
भाजपच्या येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सांतआंदेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि सांताक्रूझचे आमदार टोनी फर्ना?डिस उपस्थित होते.
श्री. हळर्णकर म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना गोव्यातील स्थितीची माहिती नाही. तसेच वीज मोफत देणे शक्मय नसल्याचे आज आमचे वीजमंत्री निलेश काब्राल यांनी दिल्लीच्या विजमंत्र्यांशी झालेल्या वादविवादावेळी पटवून दिले आहे. वीज मोफत देण्याच्या योजनेमुळे आज दिल्ली सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. तसेच वीज पुरवणाऱया कंपन्यांचे पैसे थकले आहेत. मात्र ते त्याविषयी काही बोलत नाहीत. केवळ लोकांना भुलथापा देण्याचे काम आपकडून सुरू असल्याचे श्री. हळर्णकर म्हणाले.
गोमंतकीय नागरिक भुलथापांना बळी पडणारा नव्हे. येथील कष्टकरी समाज मोफत विजेच्या अमिषालाही बळी पडणार नाही, असेही श्री. हळर्णकर म्हणाले. आपने दिल्लीवासीयांना यापूर्वी दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यांचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी कोविड काळात केंद्र सरकारकडे 5 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. एकीकडे पैसे नाहीत म्हणून केंद्राकडे हात पसरायचा आणि दुसरीकडे मोफत देण्याच्या घोषणा करायच्या, एवढेच त्यांना जमते. आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आम्ही भाजपमध्ये दाखल झालो. यामुळे आम्ही विकलो गेलो म्हणण्याचा अधिकार केजरीवाल यांना नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. सुरुवातीच्या काळातील त्यांचे अनेक सहकारी आज अन्य पक्षात गेले आहेत. तर काहीजणांनी केजरीवाल यांच्या अरेरावीला कंटाळून अन्य वाटा शोधल्या आहेत, असे श्री. हळर्णकर म्हणाले.
यावेळी आमदार टोनी फर्ना?डिस म्हणाले, अरविंद केजरीवाल नुकतेच गोव्यात आले होते. त्याचवेळी दिल्लीतील एक चर्च पाडण्यात आला. त्यासंबंधी गोमतंकीय पत्रकारांनी विचारले असता या घटनेची मला अधिक माहिती नाही, असे साचेबद्ध उत्तर दिले होते. प्रत्यक्षात केजरीवाल खोटे बोलले. कारण या चर्चसंबंधी स्थापन केलेल्या समितीत त्यांच्या पक्षाचे दोन आमदार होते. त्यांनी ही कारवाई का थांबवली नाही, असा सवाल फर्ना?डिस यांनी केला. दिल्लीतील अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळावर कारवाई करणारे केजरीवाल दिल्ली येथील चर्चवरील कारवाईवेळी गोव्यात पळून आले. आणि या प्रकरणापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील अल्पसंख्याकांना याची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी खोटे बोलून येथील अल्पसंख्याकांना गृहीत धरू नये, असे श्री. फर्ना?डिस म्हणाले.
यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा म्हणाले की, बाहेरून गोव्यात येऊन मतांसाठी खोटे बोलणाऱया आणि अल्पसंख्याकांचे धर्मस्थळ पाडणाऱया केजरीवाल यांच्या अमिषाला गोमंतकीयांनी बळी पडू नये. खोटे बोल पण रेटून बोल अशा पवृत्तीच्या आपच्या नेत्यांची डाळ गोमंतकीय शिजू देणार नाहीत. वीज मोफत देणे आर्थिकदृष्टय़ा अशक्मय आहे. कारण आता कर्ज काढून लोकांना मोफत गोष्टी दिल्या तर आगामी काळात ते फेडावेच लागेल. म्हणजेच आपल्या भावी पिढय़ांवर कर्जाचा डोंगर करणे कितपत योग्य आहे, असा सवालही सिल्वेरा यांनी यावेळी केला.