प्रतिनिधी
म्हापसा
कोरोना महामारीचे निमित्त पुढे करून म्हापसा नगरपालिकेने बाजारपेठेत गोमंतकीयांची सातवणूक चालविली असून पालिकेच्या विरोधात म्हापसा व्यापारी संघटनाही आवाज उठवीत नाही ही आश्चर्याची बाब आहे असा दावा व्यापाऱयांनी केला आहे.
गणेशचतुर्थीचा उत्सव जवळ येत आहे आणि बाजारपेठेत ग्राहक येतच नाहीत. लहान व्यापाऱयांनी जगावे तरी कसे असा सवाल एक व्यापारी उदय वेंगुर्लेकर यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोलताना व्यापऱयांनी दावा केला आहे की, म्हापसा बाजारपेठेच्या सभोवताली कडक बंदोबस्त ठेऊन बाजारात होणारी वाहनांची ये-जा बंद केली आहे त्यामुळे सुमारे शंभर मीटर अंतरावर वाहने पार्क करून ग्राहकांना बाजारात यावे लागते. कित्येकदा दोन्ही हातात 40 ते 50 किलो वजनाच्या पिशव्या घेऊन परत वाहनापर्यंत जाणे त्यांना कठीण होते. त्यात ज्येष्ठ नागरिकांना वर जाव मुठीत धरून जावे लागते.
शकुंतला पुतळय़ाच्या दोन्ही बाजूला पालिकेने काँक्रीट पोल्सची उभारणी करून दोन्ही हातात पिशव्या भरून नेणाऱयांची पालिकेने हालत बेकार करून सोडली आहे. सिमेंटच्या दोन पोलाच्यामध्ये अर्धा मीटरही अंतर ठेवले गेले नाही. त्यामुळे ग्राहकांची कुचंबना होत आहे. त्यामुळे लोक बाजारात येणेच टाळतात व बाजाराबाहेर जे काही उपयुक्त साहित्य आहे ते खरेदी करून घरी जातात असे दीपक दिवकर यांनी सांगितले.
दिलीप नाटेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पार्किंगच्या नावावर ग्राहकांना लुटण्यात येत आहे. नो पार्कींग आता पार्कींग झोन बनविण्यात आला आहे. पे पार्कींग केल्याने पालिकेचे उत्पन्न वाढले असले तरी पावणीच्या ठेकेदाराचे बरेच फआवले आहे. दि. 30 रोजी ठेकेदाराने बाऊन्सर्सनाही बोलावून वाहने पार्क करणाऱयांवर दहशत नर्माण केली आहे. ग्राहकांना व म्हापसेकरांना विनाकारण दहशतीखाली दिवस घालवावे लागतात.
ते पुढे म्हणाले की, मयडे-बस्तोडा सारख्या खेडेगावांतून भाजी आणि इतर वस्तू विक्रीस आणणाऱयांना बळजबरीने हटविले जाते. त्यांना बाजाराबाहेर रस्त्यांच्या बाजूला बसून विक्री व्यवसाय करावा लागतो. तर परप्रांतीय मात्र बाजारातच निवांतपणे व्यवसाय करतात. परप्रांतीय व्यक्ती नगरसेवकांचे मतदार आहेत तर खेडेगावातील लोक त्यांचे मतदार नाहीत. म्हापसा मार्केट सबयार्ड सदैव खुले असते. तिथे परप्रांती मोठय़ा दिमाखात व्यवसाय करतात. सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला दिसून येतो.
मासळी मार्केटच्या बाजूला मटन विक्री स्टॉलच्या रांगेत काही परप्रांतीय व्यवसाय करतात. परंतु ते सामाजिक अंतर राखत नाहीत. पालिकेला हा प्रकार चालतो असे नमूद करून फळविक्रेत्यांच्या रांगेत प्लास्टिक विक्रेते कसे आले असा सवाल उपस्थित करून पालिका मंडळाने गोमंतकीयांवर अन्याय केल्याच्या प्रतिक्रिया अन्य काही व्यापाऱयांकडून व्यक्त करण्यात आल्या. म्हापसा व्यापारी संघटना याबाबत काहीच करीत नसल्याचे नमूद करून त्यासंदभीत त्यांनी नाराजी व्यक्त केली.