बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर आणि म्हैसूर यांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केएसआरटीसीने मोठा दिलासा दिला आहे. केएसआरटीसी सोमवारपासून ५०० बसेस चालवणार आहे, तसेच बस सेवा सुरु करून शेजारच्या जिल्ह्यांतील प्रवाशांच्या अडचणी दूर केल्या आहेत.
२१ जूनपासून अनलॉक उपाययोजना सुरू झाल्यापासून, म्हैसूर वगळता सर्व जिल्ह्यांत परिवहन सेवा पूर्ववत झाल्या आहेत. परंतु म्हैसूरमध्ये कोरोना सकारात्मकता दर जास्त असल्याने निर्बंध कायम ठेवले होते.
केएसआरटीसी अधिकाऱ्यांना सांगितले की, महामारीच्या आधी दररोज सुमारे २ लाखाहून अधिक प्रवासी बेंगळूर ते म्हैसूरू दरम्यान प्रवास करत होते. रामनगर, मंड्या आणि मद्दूर येथून वाहतूक केली तर त्यांची संख्या आणखी वाढते.
कोडगू वगळता शेजारच्या जिल्ह्यांमधील बस सेवा पूर्ववत करण्यात येतील. केएसआरटीसीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक प्रभाकर रेड्डी यांनी, “कोडगू जिल्ह्यात बससेवा सुरु करण्यास परवानगी देत आहेत परंतु आंतरजिल्हा हालचालींवर मर्यादा आणत आहेत. येत्या काही दिवसांत नियम शिथिल करण्यात येतील अशी आमची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या अनलॉक कालावधीत म्हैसूर अर्बन आणि ग्रामीण विभागांनी एकत्रित १,१०० वेळापत्रकांचे संचालन केले होते जे आता ९०० पर्यंत कमी झाले होते. सोमवारी, महामंडळाच्या मागणीचे मूल्यांकन करून येत्या काही दिवसांत ५०० बसेस चालविण्याची व त्या प्रमाणात वाढवण्याची योजना आहे.