यड्राव/प्रतिनिधी :
यड्राव परिसरात कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय कामगारांना आज त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले. आपल्या मूळ गावी सोडावे अशी दोन महिन्यापासून त्यांची मागणी होती. गुरवार 14 मे रोजी 247 उत्तरप्रदेश व आज शुक्रवारी बिहार राज्यातील २३0 परप्रांतीय रवाना झाले. गावी जाण्यासाठी आपल्या बायका-मुलांसह हे कामगार येथील कुमार विद्या मंदिर मध्ये सकाळपासूनच गर्दी केली होती.
जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नागरिक आहेत. त्याच ठिकाणी त्यांना यामुळे थांबावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून चार दिवसात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथील नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले. तर आज शुक्रवारी बिहार राज्यातील नागरिकांना पाठवण्याची व्यवस्था केली. यड्राव परिसरात सुमारे 230 बिहार मधील कामगार आपल्या गावी जाणार आहेत. दुपारपर्यंत त्यांना पास देऊन एसटीने कोल्हापूर येथे सोडण्यात आले. व तेथून त्यांना रेल्वेने सायंकाळी श्रमिक एक्स्प्रेस मधून गावी सोडण्यात येणार आहे. एसटी मधून सोशल डिस्टन्सिंग पाळून शिरोळ तहसीलदार ऑफिस कडून येथील कुमार विद्या मंदिर प्रांगणात या कामगारांचे पास देऊन व्हेरिफिकेशन करून त्यांना एसटीतून कोल्हापूर येथे रवाना करण्यात आले. यावेळी तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी भेट देऊन प्रशासनातील अधिकार्यांना योग्य सुचना दिल्या. नायब तहसिलदार संजय काटकर, तलाठी नितीन कांबळे, ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.गावडे, जि.प.सदस्य व शिरोळ तालुका भाजपाचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, सरपंच श्रीमती सुमन झुटाळ, उपसरपंच विजय पाटील उपस्थित होते