प्रतिनिधी / रत्नागिरी
पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नुकतेच अंतिम वर्ष परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यावर पदव्युत्तर वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रकिया सुरु झाली आह़े
पदव्युत्तर पवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरी अर्ज भरताना अडचणी आल्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये धाव घेतली कॅफेमधून फॉर्म भरताना अनेकांच्या अडचणी दुर झाल्या. मात्र कोरोनामुळे बहुतांश सायबर कॅफे बंद असल्यामुळे अडचणींचाही सामाना करावा लागत होता. एकुणच शुल्क मुंबई विद्यापीठामध्ये ऑनलाईन कामातील तांत्रिक अडचणीचे शुल्ककाष्ट सुरूच राहिल्याने विद्यार्थी पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते.