प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये हरकती मागवण्यात आल्या होत्य़ा मात्र या कालावधीत जमीन मालकांकडून एकही हरकत दाखल झाली नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. ा़विकास सूर्यवंशी यांनी दिल़ी भूसंपादनाची कार्यवाही येत्या एक दीड महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याचेही सुर्यवशी यांनी स्पष्ट केल़े दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या विमानतळासाठी 100 कोटींची तरतूद असल्यामुळे विमानतळाचे उर्वरित काम लवकरच पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े
मिरजोळे, तिवंडेवाडीतील विमानतळासाठी आवश्यक 28 एकर जागेची संयुक्त मोजणी 7 ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये पूर्ण झाली. 30 डिसेंबर रोजी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द झाल़ी त्यावर 60 दिवसांमध्ये हरकती मागवण्यात आल्या. हा कालावधीदेखील संपुष्टात येत असून अंतिम 19 क्रमांकाची अधिसूचना लवकरच प्रसिध्द होणार आह़े
23 ऑगस्ट 2016 रोजी या विमानतळाचा उडान योजनेमध्ये समावेश झाल्यामुळे पुन्हा नागरी वाहतूक सेवेसाठी 33 हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आह़े धावपट्टी तयार असली तरी या परिसरामध्ये विमाने थांबवण्यासाठी जादा जमिनीचे भूसंपादन आवश्यक होते, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.