पुणे \ ऑनलाईन टीम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिलाय.
आज पुण्यातील रिंग रोडच्या आंदोलनाप्रसंगी त्यांनी भूमिका मांडली असून ते म्हणाले की, महाराष्ट्रात आज जे काही चालले आहे. ते शोभणारे आहे का? एका थोबाडीत शब्दावरून किती चर्चा चालली आहे आणि इकडे काय चाललं आहे. याची काही चिंता, परवा नाही. मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो, प्रकल्पांना विरोध का होतो? एक म्हणजे पर्यावरणाच्या अंगाने, तर दुसरे म्हणजे पुनर्वसनाच्या अंगाने होतो. तुम्ही पुनर्वसनाची योजना तरी दाखवा ना.पण तुम्ही एकच सांगता पैसे घ्या आणि गप्प बसा.सरकारची कोणतीही योजना असू द्या, त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, हे गडकरी का विसरत आहेत? तुम्ही अनेक ठिकाणी रस्ते करत आहात. त्यामध्ये केवळ शेतकरी विस्थापित होत नसून सर्वसामान्य नागरिक देखील विस्थापित होत आहेत.
नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी भूसंपादन केल्यावर पुनर्वसनासाठी योजना आणायला हवी. त्यांनी गावागावात फिरावं. मी त्यांना घेऊन फिरेल. यावेळी एकही शेतकरी दगड मारणार नाही याची जबाबदारी मी घेतो, अशी भूमिका बाबा आढावा यांनी पुण्यात मांडलीय.
आता पुण्यात रिंगरोड केला जाणार आहे. रस्ता बंदिस्त होणार आहे तर दुसर्या बाजूला शहरात मेट्रो भुयारी मार्गाने आणत आहे. मग इथे असा का रोड केला जात आहे? यामुळे ६ तालुक्यातील ८४ गावावर याचा परिणाम होणार आहे. हे सर्व अदानी आणि अंबानी यांच्यासाठी चालले आहे, असे देखील बाबा आढाव यावेळी म्हणाले.
Trending
- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर
- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
- ‘सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र’कडून दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार
- जेजुरीत ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूरात निवासी वसतीगृह होणार; राजू शेट्टींची घोषणा
- आपल्याच आमदारांना सांभाळण्यासाठी सरकारकडून हवे तसे लाड ; आमदार शशिकांत शिंदे
- Sangli Breaking : सांगलीत कर्मचाऱ्यांना बांधून गोळीबार करत घातला दरोडा, रिलायन्स ज्वेलरी दुकानातील घटना
- उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करुन जेजुरीकरांना न्याय मिळवून देऊ, राज ठाकरेंचे आश्वासन