साहित्य : 1 वाटी राजगिरा पीठ, 2 बटाटे वाफवून मॅश करून, 1 वाटी पनीर खिसून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरं पावडर, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार तेल अथवा तूप
कृती : बाऊलमध्ये राजगिरा पीठ घेऊन त्यामध्ये मॅश केलेले बटाटे, पनीर, हिरवी मिरची, हळद पावडर, जिरं पावडर, कोथिंबीर, काळीमिरी आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर त्यात थोडे थोडे करीत आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळा मळून पंधरा मिनिटे झाकून ठेवावा. नंतर गोळा पुन्हा मळून त्याचे एकसमान मध्यम आकाराचे गोळे करावेत. पोळपाटावर राजगिऱयाचे कोरडे पीठ पसरवून त्याची गोलाकार पोळी लाटून घ्यावी. गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करून त्यावर राजगिरा पराठा टाकावा. आता आच मंद करून कडेने तेल अथवा तूप सोडून पराठा सोनेरी रंगावर क्रिस्पी परतवून घ्यावा. तयार पराठा खोबऱयाच्या चटणीसोबत खाण्यास द्या.