ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेनेमध्ये कूरकूर चालू आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले, राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊ असे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्या लढवणार असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, कालच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर, शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यानतंर आज चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.