मुंबई/प्रतिनिधी
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात दहावी आणि बारावीचे निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आज राज्यातील कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.