ऑनलाईन टीम / सातारा :
राज्यात 5 ते 9 सप्टेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर पावसाचा प्रभाव असणार आहे. 7 आणि 8 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता जास्त असेल. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या जिह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.