कोरोनामुळे जीवन जगणे कठीण : दरवाढ पुढे ढकलण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात प्रतिवषी 1 एप्रिलपासून वीज दरवाढ लागू केली जाते. परंतु यावर्षी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक आचारसंहिता असल्याने एप्रिल महिन्यातील दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणुकांचा निकाल लागला असल्याने राज्यात नवीन वीज दरवाढ लागू होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. परंतु दररोज वाढणारे कोरोनाचे रुग्ण व सुरू असलेल्या क्लोजडाऊनमुळे दरवाढ होणार की पुढे ढकलली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील वर्षापासून कोरोनामुळे व्यवसाय मंदावले आहेत. अनेकांच्या नोकऱया गेल्या असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे दररोज महागाई वाढत असताना दुसरीकडे विजेची नवी दरवाढ लागू होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. यावेळी प्रतियुनिट 25 ते 30 पैसे दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून विजेच्या बिलात वाढ होणार आहे. यामुळे नागरिकांना शॉक बसणार आहे.
प्रतिवषी 1 एप्रिलपासून नवे दर लागू केले जातात. यासाठी राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी आपली प्रस्तावित दरवाढ केईआरसीकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. परंतु त्यापूर्वी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्याने ही दरवाढ आचारसंहितेमध्ये अडकली. विजेचा उत्पादन खर्च व वितरण खर्च यातील तूट भरून काढणे कठीण होत असल्याने लवकर दरवाढ करण्याची मागणी वितरण कंपन्यांकडून केली जात आहे.
दरवाढ पुढे ढकला
2 मे रोजी राज्यातील बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीसह मस्की व बसवकल्याण येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे यापुढील काळात दरवाढ होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. कोरोनामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले असल्याने ही दरवाढ काही महिने पुढे ढकलण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.