… उत्तरार्ध
बुधवार दि. 3 ते 9 जून 2020
हिंदूधर्मातील प्राचीन ऋषीमुनीनी सामाजिक व नैसर्गिक वातावरणाचा पूर्ण अभ्यास करून काही नियम तयार केले. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही हे हल्लीच्या हायफाय व आधुनिक विचारसरणीच्या लोकांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. लोक सरळ सांगितले तर ऐकत नाहीत. त्यासाठी त्याला धर्माचा आधार दिलेला आहे. मंदिरात अथवा स्वत:च्या किंवा लोकांच्या घरी जाताना चप्पलबुट बाहेरच का ठेवतात? सोयरसुतक असताना का शिवायचे नसते? हस्तांदोलन न करता दोन्ही हात जोडून नमस्कार का करतात? मंगलकार्याच्यावेळी आंब्याच्या पानांचे तोरण का बांधतात? देवाला व मातापित्यासह थोर मंडळींना वाकून नमस्कार करणे, पूजा करण्यापूर्वी ध्यान, प्राणायाम वगैरे करणे, सकाळ, सायंकाळी देवासमोर दिवा लावणे, शुभंकरोती म्हणणे, जेवण्यापूर्वी अन्न शुद्धीकरणासाठी श्लोक म्हणणे, जेवणानंतर वामकुक्षी करणे यालाही आधार आहेच. तसेच रात्रीच्यावेळी विहिरीचे पाणी भरू नये, रात्रीच्यावेळी बाहेर कपडे धुवू नयेत, कपाळाला चंदन अथवा गंध लावणे, बाहेरुन आल्यावर एकदम डोक्मयावरून अंघोळ न करणे, जेवल्यानंतर ताक घेणे, पूजेच्यावेळी प्राणायामे विनियोग: असे म्हणून डोळय़ाला पाणी लावणे, पूजा करतेवेळी चामडय़ाचा बेल्ट न वापरणे, पूजेनंतर तीर्थप्रसाद म्हणून पंचामृताचे पाणी घेणे या साऱया मागे वैज्ञानिक कारणे आहेत. पण हल्लीच्या लोकांना हे सारे थोतांड वाटते. ऋतुमानानुसार अन्नपाण्याचे नियोजन का करतात? उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच दारोदार होळी का पेटवली जाते? आपल्याकडे मृतदेह दफन करण्याऐवजी जाळतात, यामागील तर्क काय आहे? याबाबत गुगलवर सर्च करा. बरीच माहिती मिळेल. आपला प्राणी, वनस्पती, पाणी, नद्या, पर्वत, दगड धोंडे, देव पहातो हा इको फ्रेंडली टेंड नव्हे काय? आम्ही कुत्र्या-मांजरात पण देव पहातो, खंडोबा म्हणतो, दत्ताच्या आसपास असणारे श्वान चार वेद म्हणतो, या मागील लॉजिक काय? ग्रहणकाळात का जेवत नाहीत? अथवा वेध का पाळतात?याचा विचार करा. आतापर्यंत एकाही व्हायरसचा भारतातून जन्म झालेला नाही. कारण भारतात उंदीर, ऑक्टोपस, साप, रातकीडे, अळय़ा, कुत्री, मांजरी, पाली, वटवाघळे असे बेछूट खात नाहीत. मांसाहार खाण्यातही काही नियम आहेत, ते पाळले जातात. निसर्ग नियमाचे येथे पालन होते. धार्मिक कार्य, पूजाअर्चा, होम वगैरे चालू असताना कुत्रे शिवल्यास ते अत्यंत अशुभ मानतात. उठसूट हात मिळवणे, गळाभेट, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत का आहे? या साऱया बाबींचा डोळसपणाने विचार करा. अनेक महामाऱया व संकटे झेलून आपली संस्कृती संपन्न झालेली आहे. स्वत:च्या संस्कृतीला कमी समजणे आणि पाश्चात्य संस्कृतीला योग्य समजणे हे कोरोनापेक्षा घातक आहे. पाश्चात्य राष्ट्रेही कोरोनापासून बोध घेऊन भारतीय परंपरांचे पालन करीत आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. वरील साऱया बाबी धर्म व ज्योतिष शास्त्रात पदोपदी आढळतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेदशास्त्र संपन्न श्री संदीप पुरुषोत्तम दीक्षित गुरुजींनी ही अनमोल माहिती दिलेली आहे. यावरून कोरोना असो वा कॉलरा प्लेग… लोकांनी कसे वागावे व कशी पथ्ये पाळावीत हे समजून येईल.
मेष
मंगलकार्य, महत्त्वाच्या वाटाघाटी, कर्जफेड, देणीघेणी, नातेसंबंध सुधारणे, धनलाभ, प्रवास, नोकरी, व्यवसाय व पत्रव्यवहार या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. जुनी येणी वसुल होतील. हातून गेलेला अधिकार पुन्हा परत मिळेल. एखाद्यावर सोपविलेले महत्त्वाचे काम होईल. हरवलेल्या वस्तू परत मिळतील.
वृषभ
कोठेही सही न करता अथवा कोणतेही तारण न देता, कुणाला काही दिला असाल तर जरा सावध रहावे लागेल. गोड बोलूनच ते वसूल करण्याची पाळी येईल. जामीनकीपासून दूर रहा. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. एखादे महत्त्वाचे काम या आठवडय़ात होईल. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील.
मिथुन
दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. पण कष्ट व चातुर्य तसेच चौकसबुद्धी याच्या जोरावर बऱयापैकी पैसा मिळवाल. जागा व घर वगैरेच्या प्रयत्नात असाल तर त्रयस्थांच्या मदतीने ते काम होईल. वास्तुदोषाच्या नावाखाली केलेले बदल धोकादायक ठरतील व पैशाचा अपव्यय होईल.
कर्क
ग्रहमान सर्व बाबतीत अनुकूल आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. एकाचवेळी अनेक महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पडेल. अथवा लग्नासाठी जूनपर्यंत चांगले योग आहेत. पण दूषित गुरुमुळे त्यात काही त्रूटी राहण्याची शक्मयता आहे. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होईल. शांतमनाने निर्णय घ्यावा लागेल. कुणालाही महत्त्वाची कागदपत्रे दाखवू नका.
सिंह
आत्मविश्वास, धैर्य, कठोर परिश्रम व होकारात्मक विचार असतील तर जगात काहीच अशक्मय नसते, याचा अनुभव येईल. स्वत: केलेले कोणतेही काम चांगले असते, पण जर त्यात गोडी नसेल तर होणारे कामही फिस्कटते. यासाठी तारतम्याने सर्व गोष्टीचे मर्म ठरवावे लागेल. राशीस्वामी रविला म्हणावे तसे जोरदार बळ नाही.
कन्या
मंगळ आरोग्याच्या बाबतीत अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. बुधाची अनुकूलता जाणवू लागेल. देवधर्माबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोनही चांगला ठेवा. म्हणजे सर्व कामे यशस्वी होतील. अपयश येणार नाही. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा आहे. शुक्राच्या कृपेमुळे अनेक संकटातून वाचाल.
तुळ
रवि, मंगळाचा योग अवघड कामात यश देईल. भित्रेपणा व कमीपणा तसेच आत्मविश्वासाचा अभाव राहू देऊ नका. तुमच्या किरकोळ चुकादेखील इतरांना नको ते प्रकार करण्यास भाग पाडतील. तुम्ही काळजीपूर्वक चालत असला तरी समोरुन येणाऱयाचा भरवसा नसतो. त्यामुळे तुम्ही सावधानतेने वागले पाहिजे. आर्थिक व्यवहारात कुणावर विसंबून राहू नका.
वृश्चिक
लॉकडाऊनमुळे काही अडचणी वाढतील. पण स्वत:चे काम स्वत:च केलात तर ते अधिक फायदेशीर ठरेल. धनही देऊन जाईल. कुणाच्याही आग्रहाला बळी पडून नको त्या प्रकरणात गुंतू नका. खर्च कमाई यांचा ताळमेळ साधणे आवश्यक कौटुंबिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला मोठे यश प्रदान करील.
धनु
लवकरच गुरु बदलणार आहे. प्रेमप्रकरणात असाल तर विवाह योग, पण त्यामुळे कौटुंबिक संबंध बिघडणार नाहीत, याकडेही लक्ष द्या. एखाद्याचे चांगले सांगावयास जावे, पण त्याने त्याचा नको तो अर्थ काढावा असे ग्रहमान आहे. त्यामुळे प्रेम, दिखावा व भावनेला महत्त्व न देता कामाकडे अधिक लक्ष द्या. साडेसाती असूनही काही चांगल्या घटना घडतील.
मकर
शुक्र, राहुचा योग चांगला नाही. काहीजण मुद्दाम तुमची परीक्षा पहाण्याचा प्रयत्न करतील. पण त्यातून संबंध बिघडू देऊ नका. गैरसमजातून शत्रुत्व ओढवेल. पूर्वीची जर काही देणी-घेणी असतील जर कुणाशी वादावादी झालेली असतील तर ती प्रकरणे बाहेर निघतील. शक्मयतो नमते घेतल्यास चांगले.
कुंभ
साडेसाती विचित्र वळणावर आहे. डोळसबुद्धीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात महत्त्वाच्या पण विचित्र घटना घडतील. सहज केलेल्या थट्टामस्करीमुळे एखाद्याचे मन दुखावले जाईल. त्यातून गैरसमजला वाव मिळेल. प्रवास, देवधर्म व भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. नोकरी व्यवसायातील वातावरण आनंदी व समाधानी राहील.
मीन
देव कुणावरही अन्याय करीत नाही. चांगले वाईट जे काही घडत असते त्याला आपले या जन्मातील अथवा पूर्वजन्मातील कर्मच कारणीभूत असते, याचा अनुभव येईल. गुरु, शनि लाभात हा अतिशय चांगला योग असल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. आंबा, फणस, पेरु वगैरे काढताना झाडावर चढणार असाल तर मात्र सावध रहा. बेफिकीर वृत्ती अंगलट येऊ शकते.