घुणकी/प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्या जवळ महामार्गावर आजच्या प्रचंड पावसाने तीन ते चार फूट पाणी आलेने वाहतूक ठप्प झाली . महामार्गाच्या चौपदरी करणात नैसर्गीक प्रवाह बंद केलेने ही परीस्थीती उद्भवल्याचे जाणकारांचे मत आहे. तर महामार्गालगतच्या शेतीत व घरात पाणी शिरल्याने मोठया नुकसानीचा फटका बसल्याने संताप व्यक्त होत आहे.
महामार्गावर टोल नाक्याजवळ सकाळी दहा पासून पाणी साचल्याने एकेरी वाहतूक सुरु होती . ती दुपारी तीन वाजले पासून ठप्प झाली . सायंकाळी ऊशीरा किणी गावातून जुन्या महामार्गावरुन अत्यावश्यक व जवळ जाणाऱ्या वाहनांची एकेरी वाहतूक वडगांव पोलीसांनी सुरू करून वाहतूक कोंडी कमी करने या प्रयत्न केला . मात्र टोल नाक्याच्या दुतर्फा चार ते पाच किलोमिटर लांब रांगा लागल्याचे चित्र रात्री पर्यत होते .