नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीमधील कंपनी रियलमी चालू वर्षाच्या (2020)अंतिमपर्यंत भारतामधील कर्मचाऱयांची संख्या 10,000 पेक्षा अधिक करणार आहे, अशी माहिती कंपनीचे भारतीय परिचालनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी दिली आहे. कंपनी चालू वर्षात तीन कोटी स्मार्टफोन आणि 80 लाख कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत उपकरणांची निर्मिती करुन विकण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
उत्पादन मजबूत बनविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असून आम्ही वर्षाच्या शेवटपर्यंत कर्मचाऱयांची संख्या वाढवून ती 10 हजारपेक्षा अधिक करणार असल्याचे सेठ यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरीक्त भारतात कारखाना उभारणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सहयोग देण्यास प्रेरणा देण्याची योजना असल्याचेही म्हटले आहे.