प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमधून प्रवास करणाऱया प्रवाशाचा सव्वा लाख रूपयांचा मोबाईल चोरटय़ाने चोरून नेल़ा ही घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडल़ी विष्णू श्रीनिवास नब्बाला (27, ऱा केरळ) असे या प्रवाशाचे नाव आह़े या प्रकरणी विष्णू यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू नब्बाला हे 3 ऑक्टोबर रोजी कोकण रेल्वे मार्गावरील कोचिवल्ली चंढीगड एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होत़े प्रवासादरम्यान रात्री दिडच्या सुमारास विष्णू हे मोबाईल बघत असताना गाडीमध्ये त्यांना झोप लागल़ी याचा फायदा उठवत चोरटय़ाने त्यांचा मोबाईल चोरून नेल़ा आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच विष्णू यांनी रेल्वे पोलिसांत या घटनेची खबर दिल़ी तसेच रत्नागिरी शहर पोलिसांत चोरटय़ाविरूद्ध तक्रार दाखल केल़ी या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत़