वकिलांचा सत्कार चांगलाच सत्कर्मी लागला
@ प्रतिनिधी/ बेळगाव
मालमत्तेवर नाव दाखल करण्यासाठी तब्बल 1 वर्ष कालावधी घेण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि वकिलांनी गांधीगिरी पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱयांचा सत्कार केला. तो सत्कार चांगलाच झोंबला असून सारवासारव करण्यासाठी मनपा कर्मचाऱयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले आहे. मात्र यामुळे पुन्हा वकिलांबरोबरच सर्वसामान्य जनतेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी सर्वसामान्य जनतेची पळापळ करण्यास भाग पाडतात, हे नित्याचेच आहे. जर कामामध्ये सुसुत्रता आणि नियोजन व वेळेत केले तर कोणीच त्यांच्याबद्दल तक्रार करणार नाहीत. मात्र उताऱयावर नाव दाखल करण्यासाठी तब्बल एक वर्ष लागत असेल तर हे कोठेतरी चुकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वरि÷ अधिकाऱयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र जिल्हाधिकाऱयांनी आतापर्यंत तरी कधीच गांभीर्याने शासकीय कामाबद्दल दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी वकिलांनी जुन्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱयांचा सत्कार केला. तो सत्कार त्यांच्या जिव्हारी लागला. वकिलांनी ज्या पद्धतीने गांधीगिरी केली. त्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र आता कर्मचाऱयांनी वरि÷ अधिकाऱयांकडे धाव घेतली असून आम्ही बरोबर आहे. मात्र वकिलांनी नाहक त्रास व माझा अपमान केला म्हणून तक्रार केली आहे. तक्रार करणे योग्य आहे. मात्र आपण काम करत आहे ते योग्य आहे की नाही, हे देखील पाहणे गरजेचे आहे.
कोरोनाचे कारण पुढे करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न कर्मचाऱयांनी केला आहे. मात्र जनता काही दूधखुळी नसून साऱयांनाच सरकारी कर्मचाऱयांचा अनुभव आला आहे. त्यामुळे आता यापुढे अशाच प्रकारे कामचुकार कर्मचाऱयांचा सत्कार करणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अधिक वेळ करणाऱयांचा भर चौकात सत्कार
सध्या आम्ही केवळ कार्यालयामध्ये जाऊन छोटेखानी कार्यक्रम करून हा सत्कार केला आहे. मात्र कोणताही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी अधिक उशीर करत असेल तर त्यांचा भर चौकात सत्कार करू असा इशारा ऍड. लक्ष्मण पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे सरकारी कर्मचाऱयांनी नागरिकांची कामे तातडीने करून द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.