सातारा/ प्रतिनिधी
जिल्हय़ात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण चिंता वाढवत असताना वाढत्या मृत्यूदराने नागरिकांच्या मनात भीती वाढतेय. रविवारी 38 एवढी उच्चांकी कोरोना बळींची संख्या पुढे आली. मात्र ही भीती घालवण्यासाठी सर्वजण एकमेकांना धीर देत लढा देण्याचा प्रयत्न करत असले तरी बेड नसल्याची ओरड सुरुच आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनची आवश्यकता पाहून जिल्हय़ात अनेक संघटना, काही व्यक्तींनी ऑक्सिजन मशीन खरेदी करुन त्या मोफत पुरवण्याचे सुरु केलेले काम दिलासादायक ठरत आहे. जिह्यातील नागरिक काळजी घेत आहेत. आरोग्य विभागाच्या खांद्यावर मान ठेवून लढत आहेत. जेव्हा वाढणाया बाधितांची संख्या थांबत जाईल तेव्हा हा लढा यशस्वी होईल.
दरम्यान, जिह्यात काल शनिवारी रात्री आलेल्या अहवालात 977 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत 384 एवढय़ा जणांनी कोरोनावर मात केली असून रात्री उशिरा अहवालात … एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे तर 38 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिह्यात कोरोनामुक्ती 20 हजार पार
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 384 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून एकूण कोरणा मुक्ताची संख्या वीस हजार पार जाऊन 20,250 एवढी दिलासादायक झाली आहे. मात्र होम आयसोलेटेड असलेले नागरिक कसे कोरोनामुक्त झाले, केव्हा होत आहेत. त्यांचा कालावधी पूर्ण झाला का याबाबतची माहितीही आरोग्य विभागाने देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भीतीचा पगडा कमी होण्यास मदत होईल.
सातारा, कराडसह जिल्हा हॉटस्पॉट
सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर कोरोनाची स्थिती चिंताजनकच आहे. सर्वच तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असून यामध्ये सातारा व कराडमध्ये प्रमाण खूपच आहे. या दोन्ही तालुक्यात बाधितांचा आकडा मोठा असून बळींची संख्याही सातारा 240, कराड 143 एवढी मोठी आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये होम आयसोलेट असणारांचे प्रमाण मोठे असून होम आयसोलेट असलेल्या नागरिकांना आरोग्य यंत्रणेकडून किट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य सेविका, आशा सेविकांमार्फत यांचा फालोअप घेतला जात असला तर दुसरा कोणताही दिलासा त्यांना मिळत नाही. आपल्याच जीवावर उदार होवून हे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा लढत आहेत.
वाढत्या मृत्यूदराने चिंता जिल्हय़ातील बाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा 900 नजिक असून आजपर्यंत एकूण 866 जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन महिन्यात मृत्यूदरात वाढ झाली असून दररोज दोन आकडी संख्येने चिंता वाढत आहे. रविवारी आलेल्या अहवालात उच्चांकी 38 बाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपासून पुढे ते 85 पर्यंतच्या नागरिकांचा समावेश आहे. ज्येष्ठ रुग्णांना उपचारास नेले आणि त्यांचा मृत्यू झाला की तो कोरोना बळी ठरवला जात असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचा वातावरण आहे.